शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थ व्यवस्था मोडीत काढून आत्मनिर्भर कसे बनणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:15 IST

congress, kolhapurnews, rally कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देअर्थ व्यवस्था मोडीत काढून आत्मनिर्भर कसे बनणार?कॉंग्रेसचे प्रभारी पाटील यांचा भाजप सरकारला सवाल

कोल्हापूर : कामगार, कृषी क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढून देश आत्मनिर्भर कसा बनवणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी शेतकरी बचाव रॅलीत भाजप सरकारला विचारला. या व्हर्च्युअल रॅलीत कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते सहभागी झाले होते.शेतकरी व कामगार विरोधी कायदे राज्यसभेत बहुमत नसतानाही भाजप सरकारने मंजूर करुन घेतले. संसदेच्या मर्यादांचे त्यांनी उल्लंघन केले. संविधानाची त्यांनी टर उडविली, असे पाटील म्हणाले. दिवसरात्र कष्ट करून शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन कोणी उद्योगपतींच्या घशात घालणार असेल तर कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, त्याविरुद्ध देशभर आंदोलन केले जाईल, असेही पाटील म्हणाले.मंत्री बाळासाहे थोरात यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात एक कोटी सह्यांची मोहीम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.केंद्रात लबाडांचे सरकारकेंद्रातील सरकार हे लबाडांचे सरकार असून, त्यांनी आतापर्यंत जनतेला फसविण्याचे काम केले. असा आरोप मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. सगळी क्षेत्रं व्यापाऱ्यांना विकण्याचा यांचा प्रयत्न असून शेतकरी, कामगार यांना देशोधडीला लावणाऱ्या हुकूमशाही मोदी सरकारला चोख उत्तर देण्यास सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केले.रॅलीत मंत्री नितीन देसाई, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांची भाषणे झाली. प्रारंभी बसवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर मुझफ्फर हुसेन यांनी आभार मानले.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर