शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘एचएमटी’च्या आठवणीचे ठोके कोल्हापूरच्या हृदयात कायम !

By admin | Updated: September 13, 2014 00:38 IST

कंपनी काळाआड : २२ वर्षे शहराशी जोडली होती नाळ

सतीश पाटील / शिरोलीरोज सकाळी सातच्या सुमारास ‘एचएमटी’ डबलडेकर पकडण्यासाठी सुरू असलेली महिलांची धडपड, केवळ महिला कामगारांनीच फुल्ल भरून जाणाऱ्या बसकडे असणाऱ्या प्रवाशांच्या नजरा व शिरोली औद्योगिक वसाहतीच्या ‘एचएमटी’ स्टॉपवर सायंकाळी चारला पुन्हा डबलडेकर पकडण्यासाठी उडणारी झुंबड, हे जादा नव्हे तर १५ वर्षांपूर्वीचे शहरातील चित्र. कोल्हापुरातील सुमारे १२० कुटुंबांची आर्थिक नाडी सांभाळणारी हिंदुस्थान मशीन टुल्स तथा अभिजात समयदर्शिका (एचएमटी) ही घड्याळ बनविणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सुमारे २२ वर्षे येथे चांगल्या प्रकारे कार्यरत होती. त्यामुळे अनेक कुटुंबांबरोबर कोल्हापूरच्या जीवनाचा एक भागच ही कंपनी बनली होती. महिलांना रोजगार मिळावा म्हणून ज्येष्ठ उद्योजक शिवाजीराव देसाई व तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे १९७८ साली पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या पुढाकाराने शिरोली औद्योगिक वसाहतीत ‘अभिजात समयदर्शिका’ ही ‘एचएमटी’चे घड्याळ तयार करणारी कंपनी सुरू झाली. या कंपनीत बंगलोरहून घड्याळाचे सुटे भाग येत होते. हे सर्व सुटे भाग जोडून येथे घड्याळ तयार होत असे. जवळपास महिन्याला ६० हजार घड्याळे तयार होत होती. विशेष म्हणजे कंपनीत सर्वच१२० कर्मचारी महिला होत्या. या महिलांना कंपनीत जाणे-येणे सोपे व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे १९८०च्या दरम्यान ‘एचएमटी’ या नावाने खास डबलडेकर बसची सोयही करण्यात आली होती. त्यावेळी महिलांना प्रति महिना एक हजार ते बाराशे रुपये पगार होता. साधारण २००० सालापर्यंत ही कंपनी अतिशय जोरातचालली होती; पण सार्वजनिक क्षेत्रातील ‘एचएमटी’ कंपनीला कालपरत्वे बदल व योग्यप्रकारे मार्केटिंग करता आले नाही. बाजारात अनेक नवीन कंपन्या आल्यामुळे बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे शिरोली येथील युनिटमध्ये तयार होणारी घड्याळे उचलली गेली नाहीत. मागणी कमी झाल्यामुळे २००० साली ही कंपनी बंद पडून अवसायनात गेली. यानंतर तीन ते चार वर्षे कर्मचाऱ्यांनी ही कंपनी चालू करावी, पगार मिळावा, यासाठी आंदोलने केली. महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली; पण शासनाने याकडे लक्ष न दिल्याने अखेर कंपनी बंद पडली. कर्मचाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाने पगार, देणी भागविली असली तरी कोल्हापूरच्या उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले आणि २००३-०४ साली ही कंपनी लिलावात काढली. ज्येष्ठ उद्योगपती बापूसाहेब जाधव यांच्या ‘सरोज ग्रुप’ने ही कंपनी विकत घेतली आहे.