शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दत्त कारखान्यातील राजकारणाला मूठमाती

By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST

अडवणूक नाही : खासगीकरणामुळे कर्मचाऱ्यांना मिळाले राजकीय स्वातंत्र्य

सरदार चौगुले -- पोर्ले तर्फ ठाणे --गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असू दे, त्या कामगारांवर राजकीय दबाव असायचा. राजकीय संघर्षामुळे नोकरीपासून दूर व्हावे लागू नये यासाठी त्यांचे सत्तेपुढे शहाणपण चालत नसे. आता मात्र साखर कारखान्याचे खासगीकरण झाल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव नाही की, मतदानासाठी अडवणूक नाही. आसुर्ले-पोर्ले येथील पूर्वाश्रमीच्या दत्त साखर कारखान्यातील कामगारांबाबत हे घडले आहे. पूर्वी या कारखान्यात राजकीय विषयावर बोलायला बंदी होती. आता अशी चर्चा सुरू आहे. आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त साखर कारखाना दालमिया शुगर कंपनीने खरेदी केला. कंपनीला राजकारणाऐवजी व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे या कारखान्याचे कामगार राजकारणाबाबत मुक्त आहेत. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे पक्षाचा झेंडा हातात घेता येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले-पोर्ले, दत्त साखर कारखाना १९८३ मध्ये सहकारातून उभारला. या कारखान्यास तीन तालुक्यांतील ८० गावांचे कार्यक्षेत्र लाभले आहे. कारखान्यांच्या इतिहासात अनेक बऱ्या-वाईट घडामोडी घडल्या. त्या सहकार क्षेत्राला ज्ञात आहेत. कारखाना लिलावात निघाला. तो दालमिया शुगर कंपनीने घेतला.पूर्वी पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा केंद्रबिंदू म्हणून बिरदेवाच्या माळावर नावारूपाला आलेल्या या रोपट्याने ८० गावांत आपली राजकीय पाळंमुळं रोवली. या गावात सहकारी संस्था, ग्रामपंचायत निवडणुकीत कारखान्याच्या नावाचा एक गट तयार झाला. साखर कारखान्यामुळे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांमध्ये कारखान्याचे राजकारण घुसल्याने सहकारी संस्था मोडीत निघाल्या. शह-काटशहाच्या राजकारणाने गट-तट निर्माण झाले.गावपातळीवर सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीत उमेदवार मिळाला नाही की, कारखान्यातील कामगारांवर दबाव आणायचा आणि निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भाग पाडायचे. नोकरीच्या भीतीपोटी इच्छा नसतानाही त्यांना निवडणूक आखाड्यात उतरावे लागे. विरोधी गटातील कामगाराला मतदान करण्यासाठी धमकी द्यायची अथवा त्याला मतदान करू द्यायचे नाही. हे नाही जमलं तर बदलीची कारवाई करून इतरांवर दबाव आणायचा. त्यामुळे कामगारांना मूग गिळून गप्प राहावे लागे. जरा वळवळ करणाऱ्यांची तर नोकरीतून कायमची हकालपट्टी ठरलेली. काही स्वाभिमानी कामगारांनी दबाव नको म्हणून नोकरी सोडल्याची उदाहरणेही आहेत.या कारखान्यावर ३० वर्षांत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. गणपतराव सरनोबत यांनी स्थापन केलेल्या या साखर कारखान्यावर चारवेळा सत्ता पालट झाली. उगवत्या सूर्याला नमस्कार करीत कामगारांनी दबावाखाली काम केले; पण दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या दालमिया कंपनीने अवसायानात निघालेला हा कारखाना खरेदी करून कारखान्याला राजकीय मुक्तता दिली. त्यामुळे राजकीय अड्डा असणाऱ्या कारखान्यावर आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणतीही निवडणूक असू दे, येथील कामगार राजकीय दबावापासून मुक्त झालेला दिसतो.