शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्रुटी दूर करा : समरजित घाटगे : जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून रेंगाळलेल्या आंबेओहोळ धरणाच्या घळ भरणीचे काम सुरू आहे. पुनर्वसन न झाल्याने या कामाला ...

कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून रेंगाळलेल्या आंबेओहोळ धरणाच्या घळ भरणीचे काम सुरू आहे. पुनर्वसन न झाल्याने या कामाला धरणग्रस्तांकडून विरोध होत आहे. तरी यातील त्रुटी दूर करून पुनर्वसनाचे काम मार्चअखेर पूर्ण व्हावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

ते म्हणाले, भाजप सरकारच्या काळात २२७ कोटींचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून आणला होता. मात्र इतका मोठा निधी आणून सुद्धा हे काम अपुरे आहे. धरणग्रस्तांना विश्वासात न घेतल्याने घळ भरणीच्या कामास ते विरोध करीत आहेत. एकदा धरणात पाणीसाठा झाला की आपला पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार नाही, अशी त्यांना भीती आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला की ते स्वत: घळ भरणीच्या कामासाठी सहकार्य करतील.

---

शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल

या धरणात पाणीसाठा व्हावा, ते पाणी आपल्या शिवारात खेळावे. असे स्वप्न हे शेतकरी कित्येक वर्षे पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जमिनी विस्थापित धरणग्रस्तांसाठी दिल्या आहेत. पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते, तर घळ भरणीच्या कामाला विरोध झाला नसता. शिवाय या धरणात पाणी साठवण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले असते, असेही घाटगे म्हणाले.

---

फोटो नं ०५०३२०२१-कोल-आंबेओहोळ निवेदन

छायाचित्र- आंबेओहोळ धरण परिसरातील पुनर्वसन व घळ भरणीच्या कामासंदर्भात शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली.

--