शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक पाऊल; प्रशासनाची पाठ

By admin | Updated: September 5, 2014 23:59 IST

कोल्हापूरवासीयांचा पुढाकार : सक्षम यंत्रणा उभी करण्यात महापालिका अपयशी

इंदुमती गणेश- कोल्हापूर --पाण्यात विसर्जित होणाऱ्या मूर्तींचा अवमान आणि जलप्रदूषणाचे गांभीर्य समजून कर्तव्यदक्ष नागरिकांची भूमिका बजावत कोल्हापूरकरांनी काल, गुरुवारी गणेशमूर्तींचे दान करून पर्यावरणपूरक पाऊल उचलले. मात्र, त्यांच्या या पुढाकाराला साथ देण्यात महापालिका प्रशासनाने प्रचंड दिरंगाई दाखविली. मूर्ती विसर्जनासाठी सक्षम पर्यायी यंत्रणा उभारली गेली असती, तर जलाशयात एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नसती. या उपक्रमात सातत्य ठेवण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे ही महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची जबाबदारी असणार आहे. काल, गुरुवारी मोठ्या उत्साहात घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाले. पंचगंगा नदीघाट, रंकाळा, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कोटितीर्थ, आदी ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गणेशमूर्ती दान केल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद; पण प्रशासनाची पाठ, असेच एकूण चित्र होते. काही अतिउत्साही नागरिक निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांसोबतच पंचगंगा नदीपात्रात टाकत होते. शिवाय मूर्ती विसर्जित करण्याचेही प्रमाण बऱ्यापैकी होते. पंचगंगा विहार मंडळाचे कार्यकर्तेच काहिलीतून मूर्ती नदीच्या मध्यभागी विसर्जित करीत होते. या सगळ्या गोष्टींपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी माईकवरून सूचना देणारी यंत्रणा नव्हती. एकही अधिकारी किंवा कर्मचारी नदीघाटावर उपस्थित नव्हते. तेथे निर्माल्य टाकण्यासाठी कुंड नव्हते. काहिलींची संख्याही कमी होती.शहरातील भागाभागांत ठेवण्यात आलेल्या काहिली, शाळा, रोटरी क्लब, दीपक पोलादे, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, अशा विविध व्यक्ती व संस्थांच्या मदतीमुळे आणि जनजागृतीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. विसर्जन कुंड राहिला विचाराधीन...गणेशोत्सवाच्या या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजिबात सहभाग नव्हता. काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही उद्योजकांच्या सहभागाने कृत्रिम विसर्जन कुंड बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे ठेवला होता. महापालिकेने फक्त जागा द्यायची, तेथे विसर्जन कुंड बांधण्यासाठी येणारा सगळा खर्च उद्योजकांमार्फत केला जाईल, अशी ती कल्पना होती. त्यावर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आम्ही एस्टिमेट काढतो, जागा ठरवतो, असे सांगून वेळकाढूपणा केला. त्यामुळे ही योजना बारगळली. आता जबाबदारी सार्वजनिक मंडळांचीही...घरगुती गणेश मूर्तिदानचे सार्वजनिक मंडळांनीही अनुकरण करणे गरजेचे आहे. इराणी खणीची क्षमता संपल्याने तेथे मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आता शक्य नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आता मंडळांनीही मूर्तिदान किंवा कायमस्वरूपी एकच मूर्ती बसविण्यास सुरुवात करायला हवी. शाहूनगर मित्रमंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ यांचा आदर्श घेत विसर्जित मूर्तींची संख्या कमी करण्यावर भर देणे ही काळाचीच नव्हे, तर सर्वच जलाशयांच्या रक्षणाचाही गरज बनली आहे. शहरातील मुख्य जलाशयांच्या ठिकाणीच नागरिकांची प्रचंड गर्दी होते आणि इच्छा असूनही अनेकजण मूर्तिदान करण्याऐवजी विसर्जित करतात. त्यामुळे या विसर्जन स्थळांचे विकेंद्रीकरण झाल्यास प्रशासनावरचा ताण कमी होईल. त्या-त्या भागांतील नगरसेवकांनी पुढाकार घेऊन विसर्जनाची सोय करून दिली पाहिजे. - प्रा. विकास जाधव(सहायक प्राध्यापक, पर्यावरणशास्त्रविभाग, शिवाजी विद्यापीठ.)

या मूर्तिदान उपक्रमात सातत्य ठेवायचे असेल, तर महापालिकेने सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. पुढच्यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या आधीच तीन-चार महिने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली पाहिजे. शाडूच्या मूर्तींची माती पुन्हा कुंभाराला देणे, न रंगवलेली मूर्ती प्रतिष्ठापित करणे, हानिकारक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर अशा गोष्टींतूनही जलाशयांचे प्रदूषण थांबेल. - अनिल चौगुले (निसर्गमित्र)विसर्जन कुंडाचाही पर्याय अधिकाऱ्यांमुळे बारगळला याबद्दल सर्व पर्यावरणप्रेमी संघटना त्यांचा निषेधच करणार आहेत. आता मंडळांनीही या उपक्रमात योगदान देण्याची गरज आहे. - उदय गायकवाड (पर्यावरणतज्ज्ञ)