शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण करा

By admin | Updated: January 19, 2015 00:30 IST

अशोक भोईटे : युवकांना केले आवाहन; मनुष्य स्वभावात बदल हवा

कोल्हापूर : देशाची विविध क्षेत्रांत प्रगतशील आगेकूच सुरू असतानाच सामाजिक दरीही वाढत असल्याचे दिसते. ही सामाजिक दरी सांधून सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या युवावर्गावर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तारकार्य विभाग आणि बहाई कॅडमी, पाचगणीतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ‘बदलाकरिता नेतृत्व : व्यक्तिगत व सामुदायिक’ या विषयावरील उद्बोधन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. भोईटे म्हणाले, आज समाजातील एका वर्गाचा आर्थिक व शैक्षणिक विकास अगदी कमालीचा झाला आहे; तर दुसरीकडे आवश्यक सुविधांपासून वंचित असणाऱ्या घटकांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार तरुण पिढीने राजकीय, सामाजिक व शैक्षणिक नेतृत्व करताना केला पाहिजे. विद्यार्थ्यांना सामाजिक परिस्थितीची जाणीव असणे गरजेचे आहे. आंदोलन कोणासाठी केले जात आहे, हेच कित्येकदा लोकांना समजत नाही. नेतृत्वाकडे नैतिक ताकद असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सहनशीलता, विनय, नीतिमूल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. नेतृत्वाने सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले पाहिजे.
आनंदी व्यक्तिमत्त्व, निरोगी अभिव्यक्ती व नैतिकता या गुणांचा विकास करून समाजात नवीन बदल घडवून आणण्यासाठी युवकांनी सज्ज झाले पाहिजे. सर्जनशील बनून नवनिर्मिर्तीचा आनंद घ्या. स्त्री-पुरुष समानता आणण्याबरोबरच कुटुंबात आणि समुदायात एकता निर्माण करा. प्रभारी संचालक व विभागप्रमुख डॉ. गोरखनाथ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बहाई कॅडमी, पाचगणी यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरिता मूल्यशिक्षण, विद्यापीठ कर्मचारी प्रशिक्षण वर्ग, शिलेदार शिबिर, इत्यादी उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्बोधन कार्यक्रमात कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यासह तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्र्णी यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्र्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. युवकांनी बदलांवर विश्वास ठेवावा. मनुष्यस्वभावात बदल होऊ शकतो. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. प्रचलित क्रमिक शिक्षणपद्धतीमध्येही बदलांबाबत गांभीर्याने विचार आवश्यक आहे. नेतृत्वगुण सर्वांमध्ये असतात. फक्त त्यांचा विकास व्हायला हवा.
- लेझन आझादी, बहाई कॅडमी