शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पुसले १४७१ महिलांंचे कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या पाच महिन्यात १ हजार ४७१ महिलांच्या नशिबी वैधव्य आले आहे. तर ८४७ पुरुष ...

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या पाच महिन्यात १ हजार ४७१ महिलांच्या नशिबी वैधव्य आले आहे. तर ८४७ पुरुष विधूर झाले आहेत, महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असून, यापैकी ६१ ते ७० या वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यासह २१ ते ५० वयोगटातील मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, यामुळे बालकांच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र तर हरवले आहेच; पण महिलेला मानसिक आणि आर्थिक पातळीवरही मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, तेव्हापासून जिल्ह्यात रोज सरासरी ३० ते ४५ बाधितांचा मृत्यू होत आहे. मे महिन्यात हा आकडा ६० पर्यंत गेला होता. यामध्ये पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आहे. या दुसऱ्या लाटेत तरुणांनाही मोठ्या प्रमाणात बाधा झाल्याने वयोवृद्धांसोबतच तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. काही जणांचे नुकतेच लग्न झाले होते, काही जणांना २ ते ६ महिन्यांपर्यंतची बालके आहेत, काही जणांची मुलं ११-१२ वर्षांची आहेत. इतक्या वर्षांचा संसार अर्ध्यावरच मोडल्याने या महिलांना मानसिक आणि आर्थिक पातळीवरदेखील आता संघर्ष करावा लागणार आहे. नोकरी व्यवसायातील महिला असेल, तिला व्यवहार ज्ञान असेल तर थोडा ताण कमी होतो; पण ग्रामीण भागातील आणि विशेषत: अशिक्षित किंवा कमी शिकलेली महिला असेल तर तिला आता पुढे काय करायचे, या विवंचनेने ग्रासले आहे.

---

कोरोनाचे एकूण रुग्ण : १ लाख २८ हजार २९२

बरे झालेल्या रुग्णांची संख्या : १ लाख १२ हजार १८३

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १२ हजार ४०

---

काेरोनाने झालेले मृत्यू

वयोगट : पुरुष : महिला

२१ ते ३० : ३५ : ११

३१ ते ४० : १४६ : ५१

४१ ते ५० : २३२ : १०१

५१ ते ६० : ३२५ : १८८

६१ ते ७० : ३९१ : २६७

७१ ते ८० : २५३ : १६३

८१ ते ९० : ८५ : ५६

९१ ते १०० : ४ : १०

----

या आहेत योजना

- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत ज्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले असेल त्या कुटुंबाला एकदाच २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.

- संजय गांधी विधवा पेन्शन योजनेंतर्गत कोणत्याही विधवा महिलेला दर महिन्याला अर्थसहाय्य केले जाते. तिला एक मूल असेल तर ८०० रुपये आणि दोन मुलं असतील तर १००० रुपये दिले जातात.

---

येथे करा अर्ज

विधवा पेन्शन योजनेसाठी महिलांना आपआपल्या भागातील तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा लागतो. तेथे सर्व कागदपत्रांची छाननी व पाहणी झाल्यानंतर योजना लागू केली जाते.

--