शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-ताराराणीच्या अजेंड्यात ‘श्रीमंत कोल्हापूर’

By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST

‘अमृत योजनेतून महापालिका सक्षम करणार : जाहीरनाम्यातील प्रत्येक गोेष्ट व्यवहारात आणणार : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : महापालिकेचे केंद्र, राज्य व स्वनिधी या तीन स्तरांवर विकासाचे मॉडेल तयार केले असून, शहराचे प्रलंबित प्रश्न तत्परतेने प्रशासनासमोर मांडून ते निर्गत करणार आहे. आगामी पाच वर्षांत जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट व्यवहारात आणून ‘श्रीमंत कोल्हापूर’ करणारच; पण त्याबरोबर येथील सामान्य माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत करणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, शहरातील सोयी-सुविधांअभावी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकाला कोल्हापुरात दोन दिवस थांबावे असे वाटत नाही. यासाठी रंकाळा तलाव, पंचगंगा घाट, आदी पर्यटनस्थळे विकसित करावी लागणार आहेत. त्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला चांगले मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मोठे मॉल उभे केले जाणार आहेत. तरुणांच्या हाताला काम द्यायचे झाल्यास येथील उद्योगधंदे अधिक सक्षम झाले पाहिजेत. उद्योगधंदे वाढण्यासाठी विमानसेवा हा महत्त्वाचा घटक असून, येत्या दोन महिन्यांत खासगी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होणार आहे. आगामी आठ-नऊ महिन्यांत विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी विमानेही येथे कशी येतील, त्यादृष्टीने आम्ही नियोजन केले आहे.कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प तयार आहे, सत्तेवर आल्यानंतर वीज निर्मितीतील १/४ वीज महापालिकेला मिळणार आहे. त्यातून स्ट्रीट लाईटचे दोन कोटी वाचणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला देता येईल, सौरऊर्जाचा वापर महापालिका इमारती, कार्यालयात केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्यास ‘कोल्हापूर श्रीमंत’ होण्यास वेळ लागणार नाही. केंद्र व राज्यात सरकार आहे, त्याच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. वाय-फाय शहराबाबत एका कंपनीशी चर्चाही झाली आहे. आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दिलेली आश्वासने ही कागदावर राहणार नाहीत. ती पूर्णत्वास नेण्यासाठी वचनबद्ध आहे. उपनगरांत दोनशे कॉटच्या हॉस्पिटलचा प्लॅन तयार आहे. आम्ही केवळ हवेतील बोलत नाही, त्याच्यासाठी कोणत्या ट्रस्टला जबाबदारी द्यायची यासह प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ आचारसंहिता असल्याने काही घोषणा करता येत नसल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. हद्दवाढीबाबत संबंधित गावांना विश्वासात घेऊन प्रबोधनातून विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, सुनील कदम, सत्यजित कदम, भगवान काटे, उत्तम कांबळे, सुहास लटोरे, सुनील मोदी उपस्थित होते. विरोधकांच्याबुद्धीची कीवपालकमंत्री प्रचारात उतरणार नाहीत, अशी टूमही उठविली आहे; पण दिवसाला तीस कॉलनीमध्ये आपण प्रचार फेऱ्या पूर्ण करीत आहे. ‘स्मार्ट सिटी’ची निवड पारदर्शक झाली आहे. वास्तविक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी निकषांत बसण्यासाठी ज्या गोष्टी करणे अपेक्षित होते ते केले नाही. त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडले जात आहे. ‘स्मार्ट सिटी’बाबत विरोधकांच्या बुद्धीची कीव येत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.हे करणार‘स्मार्ट सिटी’त सहभागासाठी प्रयत्नकेंद्राच्या ‘अमृत’ योजनेतून मूलभूत सुविधांसाठी प्रत्येक वर्षी एक हजार कोटीरंकाळा, पंचगंगा घाटासह पर्यटन विकसित करणेमेडिकल टुरिझम विकसित करणे‘झोपडपट्टी मुक्त शहर’ व ‘गार्डन शहर’ म्हणून ओळख करणारस्वच्छ व मुबलक पाणीविविध जागांचा गरजेनुसार ‘बीओटी’वर विकसित करणार शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार कचऱ्यापासून वीज निर्मितीसांडपाण्याचा पुनर्वापर