शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पेयजलमधील अपहार दडपण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 27, 2014 00:14 IST

आमजाई व्हरवडेतील योजना : अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता

आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेतील घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला असून, काल १३ लाख ५० हजार ज्या अज्ञाताने ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर भरले होते, त्याचा आज, बुधवारी शोध लागला. संजय शंकर जाधव या नावे बँक आॅफ इंडिया, कोल्हापूर शाहूपुरी शाखेतून ही रक्कम वर्ग झाल्याचे आज उघड झाले आहे.जाधव यांना ग्रामपंचायतीने २४ जून १४ रोजी धनादेश दिलाच कसा व जाधव याने ही रक्कम तातडीने वर्ग केलीच कशी, याचे गौडबंगाल काय? या सर्व प्रकरणात ग्रामसेवकापासून संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबधितांचे धाबे दणाणले आहेत. कालपासून हे प्रकरण दाबण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. आमजाई व्हरवडे येथील ४९ लाखांच्या पेयजल योजनेतील काम निकृष्ट व अर्धवट आहे. याबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने हे प्रकरण बाहेर आले. या पेयजलचे बिल अदा करताना ग्रामसभा न घेता, तसेच कामाची पूर्तता झालेली नसताना मुख्य ठेकेदाराला बाजूला ठेवूनच ग्रामसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने संजय जाधव यांच्या नावे धनादेश दिला. मात्र, कोेणत्याही कामाची रक्कम देताना मुख्य ठेकेदाराच्या नावे धनादेश देऊन रक्कम दिली जाते. मात्र, साडेतेरा लाखांचा अपहार करण्याच्या उद्देशानेच जाधव यांच्या नावे धनादेश दिल्याचे आता उघड झाले आहे. पेयजलचा पूर्ण रकमेचा धनादेश देताना कामाचा दर्जा व काम पूर्ण झाल्याचे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व गटविकास अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे जरूरीचे असते. मात्र, तसे न करता धनादेश दिल्याने शासकीय अधिकाऱ्यांचाही हात आहे काय? हे आता तपासणे गरजेचे आहे. दरम्यान, या १३ लाख ५० हजार रुपयांच्या घोटाळ्यावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी पेयजलचे अध्यक्ष व सचिव यांना जबाबदार धरले आहे. त्यांनीच हा धनादेश जाधव यांना दिल्याचा आरोप केला आहे, तर पेयजलचे सचिव व अध्यक्ष यांनी या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसून, आमच्या बोगस सह्या मारल्याचा आरोप केला. कारण याची सर्व कागदपत्रे ग्रामसेवकांच्या ताब्यात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)अविनाश सुभेदारांनी स्वत: लक्ष घालावे५० लाखांच्या कामात १३ लाखांचा अपहार उघडकीस आला आहे. जर हे प्रकरण दाबले गेले, तर जिल्ह्यात चुकीचा संदेश पोहोचण्यास वेळ लागणार नाही. प्रकरण दाबले गेले, तर भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा अर्थ होईल. त्यामुळे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारवाई एवढी मोठी करा की, जिल्ह्यात पुन्हा शासकीय कामात भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.