शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक उदासीनतेवर हल्लाबोल

By admin | Updated: January 14, 2015 00:45 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : आंदोलनात शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी सहभागी; शाळा बंद ठेवून केला निषेध

कोल्हापूर : ‘हल्लाबोल, हल्लाबोल, सरकारच्या शैक्षणिक उदासीनतेवर हल्लाबोल’, ‘जाचक अटी रद्द झाल्याच पाहिजेत’, अशा घोषणा देत आज, मंगळवारी सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षणक्षेत्र संघटना समन्वय समिती आणि कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सुमारे आठ हजार शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी सहभागी झाले होते.
शासन दरबारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासह सरकारच्या शैक्षणिक उदासीनतेच्या निषेधार्थ असहकार आंदोलनातील दुसरा टप्पा म्हणून आज मोर्चा काढण्यात आला. शिवाय जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि खासगी प्राथमिक अशा ७५० शाळा बंद ठेवण्यात आल्या.
दुपारी सव्वाएकच्या सुमारास शहरातील गांधी मैदानातून मोर्चा सुरू झाला. घोषणा देत मोर्चा पुढे सरकत होता. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाले होते. खरी कॉर्नर, महाद्वार रोड, टाऊन हॉल, दसरा चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला.
या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन दिले.
यात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, जिल्हा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती राज्याध्यक्ष भरत रसाळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. बी. पोवार, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष सी. एम. गायकवाड, बी. एस. खामकर, प्रभाकर आरडे, आर. डी. पाटील, दादा लाड, आदींचा सहभाग होता. या मोर्चाने संपूर्ण शहराचे अक्षरश: लक्ष वेधून घेतले होते. (प्रतिनिधी)

शिक्षक भरतीवरील बंदी, थकीत असलेले वेतनोतर अनुदान, आदींमुळे शाळा चालविणे जिकिरीचे बनले आहे. आमचे आंदोलन हे विद्यार्थी हितासाठी आहे. त्यात शिक्षकांच्या वैयक्तिक मागण्या नाहीत. प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा २ फेब्रुवारीपासून ‘बेमुदत शाळा बंद’ आंदोलन केले जाईल. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येईल.
- डी. बी. पाटील (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ)


सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने अनेक अन्यायी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक भरडले जात आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, शाळांचा दर्जा टिकावा, यासाठी प्रलंबित प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत.
- एस. डी. लाड
(सभाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ)

विवेकानंद शिक्षण संस्थेचा पाठिंबा
जिल्ह्यात आज झालेल्या शाळा बंद आंदोलन व मोर्चाला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पाठिंबा दिला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे मोर्चात सहभागी झाले होते. त्यासह न्यू एज्युकेशन सोसायटी, डी. वाय. एज्युकेशन सोसायटी तसेच सांगली, साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेने पाठिंबा दिल्याचे महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितले.

मोर्चातील सहभागी संघटना...
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, जिल्हा महाविद्यालयीन प्राचार्य संघटना, जिल्हा पालक संघटना, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, जिल्हा शिक्षक परिषद, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा माध्यमिक कर्मचारी व शिक्षक संघ, अशा वीसहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या.