शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: मुंबईत पावाच्या लादीत ५ रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलही महागले
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
6
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
7
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
8
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
9
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
10
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
11
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
12
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
13
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
14
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
15
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
16
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
17
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
18
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
19
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
20
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
Daily Top 2Weekly Top 5

'एआय'ची नजर राहणार, अपघातांचा धोका कमी होणार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' महामार्गांचा समावेश, आयटीएमएस प्रणाली आहे तरी काय...वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:24 IST

८६९ ब्लॅकस्पॉटवर एआयच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार

कोल्हापूर : वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने विविध महामार्गांवर ‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ३६ जिल्ह्यांमधील २१ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील ८६९ ब्लॅकस्पॉटवर एआयच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. यात जिल्ह्यातील दोन महामार्गांचा समावेश आहे. त्यामुळे अपघात कमी होऊन प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

‘एआय’ आधारित आयटीएमएस प्रणाली आहे तरी काय?

आयटीएमएस म्हणजेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सध्या मुंबई-पुणे महामार्गावर ही यंत्रणा कार्यरत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने रस्त्यालगत लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होतात. संबंधित वाहनाच्या मालकाला दंडाचा मेसेज जातो. पुढील टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून दंडाची वसुली केली जाते.

सीसीटीव्ही, सेन्सर्स वाहनचालकांना इशारा देणार

एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे आणि सेन्सर्स आयटीएमएस प्रणालीला संदेश पाठवतात. त्यानुसार ही प्रणाली संबंधित कारच्या मालकास सूचना आणि इशारा देणारे मेसेज पाठवते. यामुळे अपघातांचा धोका टाळता येतो.

१७ प्रकारचे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ई-चलान

वेग मर्यादेचे उल्लंघन, लेनचे नियम मोडणे, उलट्या दिशेने प्रवास करणे, सीटबेल्ट नसणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे अशा १७ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन कॅमेऱ्यांकडून पकडले जाते. वाहनमालकांना त्याचवेळी दंडाचा मेसेज पाठवून त्याची वसुलीही केली जाते.

जिल्ह्यातील या महामार्गांचा समावेश

जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन महामार्गांवर आयटीएमएस प्रणाली बसवली जाणार आहे. यात पुणे-बंगळुरू आणि रत्नागिरी-नागपूर या महामार्गांचा समावेश आहे. प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जाणार आहेत. यात ब्लॅक स्पॉट आणि रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे.

अपघातांचा धोका कमी होणार

या प्रणालीमुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील. धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांना दंडाचा भुर्दंड बसेल. ठिकठिकाणी ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास सुरक्षित होईल, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

जिल्ह्यातून जाणारे पुणे-बंगळुरू आणि रत्नागिरी-नागपूर या दोन महामार्गांवर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित होईल. यामुळे रस्ता सुरक्षेत भर पडेल. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास दंड भरण्याची वेळ येणार नाही. - सत्यराज घुले - महामार्ग वाहतूक पोलिस निरीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : AI Eyes on Kolhapur Highways: Accidents to Reduce with ITMS

Web Summary : Kolhapur highways will implement ITMS, using AI to monitor traffic violations. Cameras and sensors will detect offenses, issuing e-challans for safer travel on Pune-Bangalore and Ratnagiri-Nagpur routes.