शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य, डाळीनंतर आता भाजीपालाही कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:37 IST

market, vegitabale, kolhapurnews कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. किलोचे भाव १०० रुपयांवर पोहोचल्याने किचन बजेटही कोलमडले आहे. परवडत नसल्याने ताटातून भाज्याच गायब झाल्या आहेत. बाजारात आवकही कमी झाली आहे. पावसामुळे प्रत खालावली तरी व्यापाऱ्यांकडून मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.

ठळक मुद्देकडधान्य, डाळीनंतर आता भाजीपालाही कडाडला किचन बजेट कोलमडले : परतीच्या पावसामुळे आवक घटली

कोल्हापूर: कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. किलोचे भाव १०० रुपयांवर पोहोचल्याने किचन बजेटही कोलमडले आहे. परवडत नसल्याने ताटातून भाज्याच गायब झाल्या आहेत. बाजारात आवकही कमी झाली आहे. पावसामुळे प्रत खालावली तरी व्यापाऱ्यांकडून मात्र चढ्या भावाने विक्री होत आहे.नवरात्रौत्सव काळात शाकाहारवरच भर असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढते; पण बाजारात भाजीपालाच नाही. मार्केट यार्डात सौद्याला येणारा कृषिमालही कमी झाला आहे. याला गेले आठवडाभर सुरू असलेल्या परतीचा पाऊस कारणीभूत ठरला आहे. कोल्हापुरात आजूबाजूच्या तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटक, सांगली, सोलापूर येथून कृषी माल सौद्यासाठी येतो; पण आठवडाभर सर्वदूर पाऊस कोसळत आहे.

ढगफुटीसारख्या पडलेल्या या पावसामुळे भाजीपाल्याची पिके पाण्याखाली गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतमाल झाडावरच कुजला आहे, तर कुठे त्याची तोडणी करण्यासाठी शिवारात जाता येत नसल्याने तो बाजारापर्यंत येऊ शकलेला नाही. परिणामी बाजारात सध्या भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. जो काही भाजीपाला बाजारात आला आहे, तोही निकृष्ट आहे. त्याची प्रत खूपच खालावलेली आहे.वांगी, दोडका, बिन्स, कोबी, कारले, फ्लॉवर, गवार, इतक्याच भाज्या बाजारात दिसत आहेत. त्याची गुणवत्ताही कमालीची खालावलेली आहे. तरी त्याचा दर १०० ते १२० रुपये किलो असा आहे. मागील आठवड्यात ३५ ते ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची आता ८० रुपये किलोवर गेली आहे.पालेभाज्या ३० रुपये पेंढी मेथीकांदेपात, पोकळा, शेपू या दहा ते पंधरा रुपये पेंढी मिळत होत्या. त्याची किंमत आज ३० रुपये झाली आहे. घाउक बाजारात हाच दर शेकड्याला ८०० ते हजार रुपये आहे; पण किरकोळ बाजारात मात्र तिप्पट दराने विकल्या जात आहेत.टोमॅटोची आवक दिसत आहे; पण त्याची प्रत खालावलेलीच आहे. दरही किलोला ४० ते ५० रुपये असेच आहेत. कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा असली तरी किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये पेंढी अशा चढ्या दराने विक्री होत आहे.कडधान्येही आवाक्याबाहेरभाजीपाला महागला आहे, म्हणून कडधान्ये खायची म्हटली तरी तीही आधीच कडाडली आहेत. गेल्या पंधरवड्यापासून कडधान्याचे दरही वाढले आहेत. तूर १२५, मूग ९४, वाटाणा ११०, चवळी ७०, हरभरा ७५, मसुरा ८० असे सर्वसाधारण दर आहे. मागच्या महिन्यात हेच दर ६० ते ७० च्या आसपास होते.कांदे दरात आणखी उसळीकांद्याच्या दरात आणखी वाढ झाली असून, घाऊक बाजारात कमाल दर ६०, तर किमान ४० रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारातही हीच परिस्थिती असून, निकृष्ट पद्धतीचा भिजका कांदा ५० ते ६० रुपयांना विकला जात आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर