शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी घेतले दहा विद्यार्थिनींना दत्तक

By admin | Updated: January 20, 2015 23:47 IST

उपक्रमशील शाळा : धुंदवडे विद्यामंदिरातील अनोखा उपक्रम

मारूती शिंदे - साळवण -विद्यार्थी आणि समाजहित यांची जाण ठेवून अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांमुळे अनेक शाळा नावारूपास आल्या आहेत. शाळा हेच आमुचे आनंदनिधान। अर्पू तन मन शाळेसाठी ।। शालामंदिरात विद्यार्थीच देव । झिजवू आमचा जीव त्यांच्यासाठी ।। या उक्तीप्रमाणे काम करणाऱ्या विद्यामंदिर धुंदवडे (ता. गगनबावडा) या शाळेतील दहा शिक्षकांनी गरीब, कष्टकरी, शेतमजूर कुटुंबातील दहा विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षकांचे कष्ट, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची उत्साही साथ यामुळे या शाळेची उपक्रमशील आणि आदर्श शाळा म्हणून ओळख आहे.धामणी खोऱ्यातील दुर्गम धुंदवडे विद्यामंदिरात पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. ही शाळा सतत गुणवत्ता विकास उपक्रम राबवते त्यामुळे या शाळेला ‘ए प्लस’ शैक्षणिक दर्जा मिळाला आहे. या शाळेने सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुक्यात प्रथम, तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या शाळेला ‘स्वच्छ, सुंदर हिरवी शाळा’ पुरस्कार मिळाला आहे. स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात या शाळेने सलग आठ वर्षे जिल्ह्याचे विजेतेपद पटकाविले आहे, चौथी शिष्यवृत्तीत १५, तर सातवी शिष्यवृत्तीत २८ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.या शाळेने विविध उपक्रम राज्याला दिले आहेत. स्काऊट गाईड, समाजसेवा संस्कार शिबिर प्राथमिक शाळेत निवासी स्वरूपात राबविणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. तीन दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांच्या चहा, नाष्टा, जेवणाची सोय ग्रामस्थ करतात. ‘वेध भविष्याचा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना रोज वेगवेगळे प्रश्न देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. घागर, तांब्या, टाळ, आदी. टाकाऊ साधनांपासून तयार केलेल्या संगीत साहित्यावर होणारा संगीत परिपाठ जिल्हाभर प्रसिद्ध आहे. ‘शाळा गावाची, गाव शाळेचा’ या भावनेतून ग्रामस्थ लोकवर्गणीद्वारे मदत करतात. ही शाळा ‘बिनकुलपाची‘ शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. गटशिक्षणाधिकारी एम. एस. मांडे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार, केंद्रप्रमुख ए. बी. कोळेकर यांच्या मार्गदर्शनाबरोबरच शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ शाळेच्या उपक्रमांत सहकार्य करतात.थेट 'एसएमएस'द्वारे संवादविद्यार्थ्यांची, शाळेची प्रगती व माहिती मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पालकांपर्यंत पोहोचविली जाते. ‘वे टू एसएमएस’द्वारे माजी विद्यार्थ्यांशीही संपर्क साधला जातो. सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अध्यापक व्ही. पी. पाटील यांनी कन्यारत्न झालेल्या पालकांच्या नावावर ५०० रुपयांची ठेव ठेवण्याचा उपक्रम राबविला आहे