शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:40 PM

Adavali village agitation: आठवड्याभरात रस्त्यांची-नाल्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करण्याचा इशारा

ठळक मुद्देसंतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं.

कल्याण: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच, तीन दिवसापासून कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं.

आज दुपारी दोन तास कोसळलेल्या पावसाने कल्याण-मलंग रोड वरील आडवली गावातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. तर काही चाळीमध्ये देखील पाणी शिरलं. पावसाने आधीच जनजीवन विस्कळीत झालंय, त्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरात रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करू, असा इशारा देत कल्याण ग्रामीणमधील आडवली गावात नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं. 

यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच, आडवली गावात नालाच नसल्याने अशी परिस्थिती उदभवत आहे. येत्या आठवडाभरात जर 27 गावांमधली रस्त्यासह नाल्याची काम सुरू केले नाही तर सर्व रस्ते बंद करून रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणagitationआंदोलन