शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मराठा समाजाला आरक्षण मग मुस्लिमांना का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:08 PM

असदुद्दीन ओवेसी : फैजपूर येथील जाहीर सभेत टीका

फैजपूर, ता. यावल (जि. जळगाव) : महाराष्ट्रात भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते तर मुस्लिम समाजाला आरक्षण का देत नाही असा सवाल उपस्थित करत भाजप मुस्लिमांवर अन्याय करत आहे असा आरोप एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी येथे आयोजित जाहीर सभेत केला.रावेर विधानसभा मतदारसंघाचे एआयएमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारार्थ शहरातील मिल्लत नगरच्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत बोलताना ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारामुळे देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर कडाडून प्रहार केला. तिहेरी तलाख विधेयक चुकीच्या पद्धतीने पारीत झाल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधारी यांच्या उदासीन धोरणामुळे रावेर-यावल भागात उच्च महाविद्यालयीन उर्दू शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांनी मुसलमानांच्या मतांच्या जोरावर पदे भुषविणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला.जातीचे राजकारण नाहीएआयएमआयएम फक्त मुस्लिमांची पार्टी असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढत जातीपातीच्या पुढील राजकारण करीत असल्याचे स्पष्ट केले. त्याचाच भाग म्हणून धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक चळवळीतुन पुढे आलेले विवेक ठाकरे यांना उमेदवारी दिल्याचे ते म्हणाले.खासदार ओवेसी यांनी ५८ मिनिटांच्या भाषणात मुस्लीम, दलित व बारा बलुतेदार यांच्यासह केळी व ऊस उत्पादक यांच्या विकासाचा अजेंडा व त्याबाबतचे धोरण राबवणार असल्याचे नमूद केले. डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात सुद्धा सरकार संवेदनशील नसल्याचा त्यांनी आरोप केला.सभेप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ.खालिद परवेज यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, महासचिव मुजाहिद शेख, सुधाकर भंगाळे,कासम खाटीक,राजेंद्र वारके, खुशाल भंगाळे, चैतन्य बोरोले, खेमचंद्र बोंडे, प्रचार समिती प्रमुख अशरफ तडवी, सहप्रमुख नावेद खान, सचिव कलिम खान, झोन अध्यक्ष रेहान जहागिरदार, जळगाव लोकसभा अध्यक्ष जिया बागवान, नावेद खान, फैजपूर शहराध्यक्ष इम्रान शेख, महासचिव इम्रान खान, यावल शहराध्यक्ष आबीद खान, महासचिव वसीम शेख, रावेर शहराध्यक्ष अकबर खान, महासचिव वसीम शेख,असीम खान आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नईम शेख तर आभार नगरसेवक अक्रम देशमुख यांनी मानले.केळीला न्याय हाच यापुढे एआयएमआयएमचा अजेंडाकेळीचे विक्रमी उत्पादन काढण्यात रावेर-यावल तालुका अग्रेसर असतांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. केळीला फळाचा दर्जा, विमा संरक्षण, नुकसान भरपाई प्रती हेक्टरी १ लाख मिळावी आणि केळीला शालेय पोषण आहारात समाविष्ठ करणे हा यापुढे एआयएमआयएम पक्षाचा अजेंडा राहील. येत्या अधिवेशनात राष्ट्रीय बागवाणी बोर्ड आणि फलोत्पादन मंत्रालयाला केळीबाबत निर्णय घ्यायला भाग पाडण्यात येईल असेही खासदार असुदोद्दीन ओवेसी यावेळी म्हणाले.