शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसेची कास धरल्यावरच आपण पुढे जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

जळगाव : महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यातून, कृतीतून, कार्यातून समतेचा विचार दिला. बाबासाहेबांनी बुद्धाचं बोट पकडलं ...

जळगाव : महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यातून, कृतीतून, कार्यातून समतेचा विचार दिला. बाबासाहेबांनी बुद्धाचं बोट पकडलं व तो अहिंसेचा विचार, मार्ग आपल्याला दाखवला. अहिंसेची कास धरल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. असे विचार जेष्ठ नाटककार व परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी ''फुले-आंबेडकर आणि आपण'' या विषयावर बोलताना व्यक्त केले.

नाशिक येथील पुरोगामी विचार मंच आयोजित या महात्मा फुले जयंती निमित्त व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या साहित्याचा, विचारांचा सामाजिक कार्याचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील सामाजिक चळवळी वर परिणाम झाला. मराठी रंगभूमीची सुरुवात तंजावरी नाटकांपासून झाली असून,या परंपरेत महात्मा फुले यांचे तृतीय रत्न हे मराठी रंगभूमीवरचे अतिशय महत्त्वाचे नाटक असल्याचे सांगितले. फुले यांनी लिहिलेले ''अखंड'' सत्यशोधकी परंपरा, आंबेडकरी जलसे यासारख्या सांस्कृतिक बाबींकडे सुद्धा शंभू पाटलांनी लक्ष वेधले. क्रांतीचा विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हजारो वर्षांच्या आपल्या समाजावर च्या अन्यायाला वाचा फोडतात आणि या चळवळीत ते तथागत बुद्धाचे बोट पकडतात. बुद्धाचा अहिंसेचा विचार पुढे नेतात बाबासाहेबांचा हाच विचार आपल्याला पुढे न्यावा लागणार आहे म्हणून आपल्याला अहिंसेची कास धरल्याशिवाय आपलं उत्थान होऊ शकत नाही. या साठीच आपल्याला महात्मा गांधी , रामायण , महाभारत पण समजून घ्यावे लागणार असल्याचेही शंभू पाटील यांनी सांगितले.