शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांमधील वेळेचा सर्वच पातळ्यांवर उपयोग व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

दुसरी लाट ओसरत आहे, त्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. जिल्हा पहिल्या स्तरात असताना सरसकट सर्वांनाच ...

दुसरी लाट ओसरत आहे, त्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. जिल्हा पहिल्या स्तरात असताना सरसकट सर्वांनाच आता तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे खरच तिसरी लाट पुढे लोटली जाईल, निर्बंधांमुळे यंत्रणेला पुरेसा वेळ मिळेल? यात सर्वांचीच भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

विषाणू त्याची प्रकृती बदलतोय व तो बदलत राहणार. तो जोपर्यंत स्वत:मध्ये बदल करणे थांबवत नाही, तोपर्यंत ही साथ सुरूच राहणार आहे. आपल्याला त्यासोबतच जगावे लागणार आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आता लावलेल्या निर्बंधांमागची भूमिका समजून घेतली असता यंत्रणेला पुरेसा वेळ मिळेल, ऑगस्टमध्ये येणारी लाट सप्टेंबरपर्यंत पुढे जाईल, या कालावधीत पुरेसे लसीकरण होऊन अधिकाधिक लोक सुरक्षित होऊ शकतात, उपाययोजना अधिक चांगल्या होऊ शकतात, असे काही प्रमुख डॉक्टर सांगतात. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा पॅटर्न बघितला असता लॉकडाऊनचा संसर्ग वाढीवर परिणाम झाल्याचे दिसते. लॉकडाऊनच्या काळात रुग्णसंख्या व मृत्यू कमी झाले आहेत. पहिल्या लाटेत मात्र, या उलट चित्र होते. मात्र, दुसऱ्या लाटेतील विषाणू हा अधिक घातक व अधिक वेगाने पसरणारा होता. त्याने स्वत:त पुन्हा बदल केले असून तो अधिक घातक असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी आपल्यालाही सर्वच पातळ्यांवर सज्ज राहावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेतील मागणीपेक्षा तीन पटीने तुमच्याकडे ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था असावी, असे आदेश आरोग्य विभागाकडून आले आहेत. त्या दृष्टीने आता उपाययोजना सुरू झाल्या आहेत. साधारण ऑगस्टपर्यंत या सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत. तोपर्यंत तरी वेळ हवा. शिवाय लसीकरणात तरुणांचे लसीकरण अद्यापही पुरेसे झालेले नाही, लसींचा तुटवडा असल्याने यात खंड पडत आहे. आतापर्यंत केवळ ५ ते ६ टक्के तरुणांचे लसीकरण झाले आहे. ही संख्या त्यामानाने कमी आहे. हातात असलेल्या वेळेचा त्या पातळ्यांवर उपयोग झाला नाही तर आर्थिक कोंडी तर होईलच शिवाय तिसरी लाट थोपविणे अधिक कठीण जाईल, दोन्ही पातळ्यांवरचे हे अपयश असेल. म्हणून जर लाट पुढे लोटण्यासाठी किंवा यंत्रणेला उपाययोजनांना पुरेसा वेळ मिळविण्यासाठी हे निर्बंध लावले आहेत तर त्या वेळेचा उपयोग व्हावा. अन्यथा लाटा येतच राहतील.