शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंत वारकऱ्याच्या अचानक जाण्याने वारकरी मंडळी झाली "पोरकी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST

हळहळ : संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे निधन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुखी सदा हरी ...

हळहळ : संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुखी सदा हरी नाम आणि सतत पांडुरंगाच्या भक्तीची ओढ असलेले निष्ठावंत रामसेवक आणि संत मुक्ताबाई राम पालखीचे सेवेकरी जितेंद्र वाळके यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने ग्रामदैवत श्रीराम मंदिरातील वारकऱ्यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या जाण्याने आम्ही पोरकी झालो असल्याची खंत ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे गादीपती ह.भ.प मंगेश महाराज जोशी यांच्यासह इतर वारकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

जितेंद्र वाळके यांना नेहमी सर्वजण प्रेमाने जितू काका म्हणून हाक मारीत. ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या परंपरेतील सर्व उत्सवात ते कायम नित्य सेवेत असायचे, त्यात पंढरपूरची वारी, रथोत्सव, श्रीराम नवमी या सर्व उत्सवात अगदी निष्ठेने सेवा करीत.

दरवर्षीची पंढरीची पायी वारी म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच होती. ज्येष्ठ महिना लागला, की वारीची तयारी मोठ्या उत्साहाने करायचे. जळगाव महापालिकेत पाणी पुरवठा विभागात ते नोकरीला होते. पंढरपूरच्या वारी साठी सुट्टी मिळेल की नाही, याची दरवर्षी त्यांना खूप चिंता लागून असायची. मात्र, मंगेश महाराज जितू वाळके यांना चिंता करू नका, श्रीरामचंद्रांच्या व संत मुक्ताईंच्या चरणाशी साकडे घालायचे सांगायचे. पंढरपूरच्या वारीला जाण्याची इच्छा पांडुरंगच पूर्ण करेल, असे सांगून त्यांना नेहमी धीर द्यायचे.

इन्फो :

गेल्या वर्षांची जितू काकांची ठरली शेवटची वारी

कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनातर्फे पंढरपूरची वारी व यात्रा उत्सव रद्द करण्यात आला होता. फक्त राज्यभरातील प्रमुख पालखीना पाच वारकऱ्यांच्या उपस्थित पंढरपूरला येण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगेश महाराज यांना विणेकरी, पखवाजी, चोपदार, पालखीवाले व ते स्वतः मिळून पाच जण होत असल्याने, जितेंद्र वाळके यांना पंढरपूरला कसे घेऊन जायचे असा प्रश्न पडला होता. मात्र, यावेळी ठरलेल्या पाच जणांपैकी दोन जणांनी अचानक वारीला येण्याचे टाळल्यानंतर, या मध्ये जितू काकांचा नंबर लागला. मंगेश महाराजांनी जेव्हा जितू काकांना पंढरपूरला वारीला येण्याचा निरोप दिला, तेव्हा जितू काकांना गगनात मावेनासा आनंद झाला होता. त्यानंतर ते मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या वारीला गेले आणि ती त्यांची शेवटची वारी ठरली.

इन्फो :

अन् वारकरी मंडळी झाली ''पोरकी''

उत्साह, पांडुरंगाची ओढ, भक्तिभाव आणि इतरांना प्रति स्नेह व प्रेमा मुळे जितू काकांनी सर्वांच्या मनात घर केले होते. वारीमध्ये सर्व प्रकारची सेवा ते करायचे, इतरांची काळजी घ्यायचे, त्यांच्या शिवाय पंढरपूरची वारी म्हणजे शक्यच होत नसे. त्यांच्या शिवाय आमची यंदाची पंढरपूरची वारी कशी साजरी होणार, अशी खंत या वारकरी मंडळीतून व्यक्त करण्यात येत आहे.