शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तलावांचे पुनर्भरण..पिकांचे सरण... आणि त्यांच्यासाठी मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST

संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : आधीच अतिपावसामुळे खरिपातील पिकांना पाणी अधिक झाले आहे. हे कमी की काय? जामदा ...

संजय हिरे

खेडगाव, ता. भडगाव : आधीच अतिपावसामुळे खरिपातील पिकांना पाणी अधिक झाले आहे. हे कमी की काय? जामदा डावा कालव्याला सोडलेल्या पाण्याच्या पाझरामुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यांतील कालव्याखालील हजारो हेक्टरवरील खरीप पिके वाया जाण्याची स्थिती आहे.

यामुळे एकीकडे तलाव व धरणांचे पुनर्भरण, त्यामुळे पिके जणू सरणावर जात आहेत. मन्याड धरणाच्या ओव्हरफ्लोमधून गिरणा नदीत वाया जाणारे पाणी मागील दहा-पंधरा दिवसांपासून जामदा डाव्या कालव्यात सोडण्यात आले आहे. यातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलाव व भोकरबारी धरण भरण्यात येत आहेत. गिरणेवरील जामदा बंधारा येथून जामदा डावा कालवा निघातो. चाळीसगाव व भडगाव तालुक्यात जवळजवळ ५०-७० मैलांपर्यंत कालव्याची लांबी आहे. लाखो हेक्टर शेतजमीन कालव्याखाली येते.

कालव्यापासून अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत कालवा वितरिका(चाऱ्या) यातून कालव्याचे पाणी पाझरते. जामदा कालवा या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत पाझरतो. हे पाणी उतारावरील शेतजमिनीत वाहते. यामुळे सततच्या पाण्याने पिकांची मुळे पोखरून निघत आहेत. अतिपाण्याने मुळे कुजत, सडत आहेत.

कायमची डोकेदुखी

दरवर्षी पावसाळ्यात गिरणा किंवा मन्याड धरण भरल्यानंतर गिरणा नदीत वाया जाणारे पाणी या जामदा कालव्यात टाकले जाते. तेथून म्हसवे तलाव व भोकरबारी भरण्यात येते. पंधरा दिवस ते महिनाभर हे पुनर्भरण चालते. शिंदी येथील शेतकरी रमेश केशव पाटील यांनी लोकमतला आपली व्यथा मांडतांना सांगितले की, कालव्याखालील विहिरी या पाझरामुळे तुडुंब भरल्या आहेत. त्यावरून ओसंडत उभ्या कपाशीत पाणी पंधरा दिवसांपासून वाहत आहे. यामुळे संपूर्ण उत्पन्न बुडाले आहे. देवबानं झाय्

थोड्ं..पाटबंधारांनी. धाड् घोडं..! पावसाचे पाणी कमी झाले की काय? पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पाणी फिरवले. असे गाऱ्हाणे मांडले.

या कालव्याखाली जामदा, भऊर, बहाळ, गुढे, कोळगाव, शिंदी, खेडगाव ,शिवणी, वडगाव-नालबंदी, वलवाडी ते थेट आमडदेपर्यंतच्या शिवारातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.

फोटो कॅप्शनः पारोळा तालुक्यातील म्हसवे तलाव, भोकरबारी धरणात जामदा डावा कालव्यातून सोडलेले पाणी. कालव्याच्या पाझराने तुंडुंब भरलेल्या विहिरी व कपाशीत साचून राहिलेले पाणी