शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बाधित वृद्धाच्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:41 IST

कोविड रुग्णालय : डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप, अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका

जळगाव : शिवाजीनगरातील नीळकंठ दयाराम पाटील या ६५ वर्षीय कोरोनाबाधितवृद्धाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने रुग्णालयात नातेवाईक संतप्त झाले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना अतिदक्षता विभागाची गरज असतानाही त्यांना सामान्य कक्षातून हलविण्यात आले नाही, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत संताप व्यक्त केला.रात्री आठ वाजेच्या सुमारास रुग्णालय आवारात गर्दी झाली होती़ अधिष्ठातांची भेट घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती़-नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगरातील नीळकंठ पाटील यांना बारा दिवसांपूर्वी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ कोविड रुग्णालयातील ९ नंबर कक्षात ते दाखल होते़ त्यांची आॅक्सिजन पातळी खालावली होती़ तीन दिवसांपूर्वी वरिष्ठ डॉक्टर्सनी ज्युनिअर डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, संबंधित कर्मचारी व डॉक्टर्सनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविले नाही व मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता थेट मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली़ दरम्यान, या बाबीमुळे संतप्त होत नातेवाईक तसेच छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, भगवान सोनवणे यांच्यासह पदाधिकारी तसेच धर्मरथ फाऊंडेशनचे विनायक पाटील व कार्यकर्ते यांनी रुग्णालय आवारात येऊन डॉक्टर्सला जाब विचारला़-संतोष पाटील यांनी सुरक्षा रक्षकांवरही संताप व्यक्त केला़ तोंड बघून वाहने आत सोडली जातात असा आरोप त्यांनी केला दुपारी व्हाआयपींची वाहने लागलेली अस तात, याबाबतही त्यांनी विचारणा केली़-वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांनी येऊन बाजू ऐकून घेतली़ अधिष्ठाता न आल्याने उ पस्थितांनी संताप व्यक्त केला़ डॉक्टर्सच्या हलर्गीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप केला़ शिवाय या आधीही सांगूनही एक मृ त्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला़ अखेर अधिष्ठाता यांची भेट घेतल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली़ संबधित मृत वृद्धांचे वडिल हे माजी नगराध्यक्ष होते़-मयताचे नातेवाईक स्मशानभूमीमध्ये गेले असता तेथेही ओट्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोपही नातेवाईकांतर्फे करण्यात आला.दोन वेळा स्वच्छतागृहात पडलेनीळकंठ पाटील हे बाधित वृद्ध रुग्णालयातून स्वच्छतागृहात जात असताना दोन वेळा खाली पडले होते़ मात्र, त्या ठिकाणी लक्ष द्यायला कोणीही तयार नव्हते़ जर अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नव्हता तर रुग्णालयाने तशी माहिती देणे गरजेचे होते़ आम्ही खासगी रुग्णालयात रुग्णाला हलविले असते. मात्र, रुग्णालयाने तसे केले नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे होते़संबंधित बाधित रुग्णांवर बारा दिवस उपचार सुरू होते़ त्यांची प्रकृती ठिक होती़ रुग्णालयात सेंट्रल आॅकिसजन सिस्टीम असल्याने आॅक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होता़ अतिदक्षता विभागात बेड खाली नव्हते़ त्यांचा अचानक मृत्यू झाला़ हृदयस्रायूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने असा अचानक मृत्यू होऊ शकतो़- डॉ़ दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षकउपचार होत नव्हते तर रुग्णालयाने तसे सांगायला हवे होते़ आता कितीही तक्रारी केल्या तरी माझे वडिल काही परत येणार नाही़ वडिलांना श्वास घ्यायला अडचणी होती, त्यांन जेवणही करता येत नव्हते, आम्ही वारंवार डॉक्टरला सांगत होतो़ मात्र, दुर्लक्ष झाले़ अतिदक्षता विभागात हलविण्याची मागणीही केली़ मात्र, ते ठीक आहेत केवळ विकनेस आहेत,अशी उत्तरे मिळायची आणी आज थेट दुपारी तब्ब्येत बिघडली व मृत्यू झाल्याचा निरोप आला़ नुसत्या विकनेसने मृत्यू होतो का?- निशांत पाटील, मयताचा मुलगा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव