शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

यापुढे निवेदन नाही, ठोकशाहीनेच जाब विचारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:27 PM

जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या ...

जळगाव : शहरातील महामार्गावर ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यान मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे चार दिवसांत न बुजविल्यास तसेच महामार्गाच्या साईडपट्ट्या १५ दिवसांत न भरल्यास शिवसेनेकडून ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन न देता ठोकशाहीने जाब विचारण्यात येईल, असा इशारा गुरूवारी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना दिला. सिन्हा यांनी गुरूवारपासूनच खड्डे बुजण्यास सुरूवात करण्याचे आश्वासन दिले.राष्टÑीय महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीही या ठिकाणी अपघात झाला होता. तसेच भुसावळ ते धुळे दरम्यान महामार्गाच्या साईडपट्ट्या खराब झाल्या असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. यापूर्वी एरंडोलजवळ अपघातात ९ जणांचा बळी गेला होता. याबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाºयांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती. बुधवारी पुन्हा दोन अपघात झाल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन मालपुरे, महानगराध्यक्ष मोहन तिवारी यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिकांनी ‘नही’चे कार्यालय गाठले.‘नही’चे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांना निवेदन न देता केवळ चर्चा केली. त्यात यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊनही उपयोग झालेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. महामार्गावर आणखी बळी गेल्यास त्याची जबाबदारी घेणार का? अशी विचारणा केली. सिन्हा यांनी मक्तेदाराला मटेरियल मिळत नव्हते. त्यामुळे उशीर झाला. त्याला नोटीसही दिली.अखेर दुसरीकडून मटेरीयल उचलण्यास सांगितले आहे, असे सांगितले.खड्डे बुजण्याचे आश्वासनगुरूवारदुपारी २ वाजेपासूनच अजिंठा चौफुली ते इच्छादेवी दरम्यानचे खड्डे बुजायला सुरूवात करीत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, चेतन प्रभूदेसाई, राहुल नेतलेकर, लोकेश पाटील, मंगला बारी, राहुल पोतदार, जितू बारी, राजेंद्र पाटील, विजय चौधरी आदी उपस्थित होते.चार दिवसांचा अल्टीमेटम; अन्यथा ठोकून काढणारईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसांत तर धुळे ते भुसावळपर्यंतच्या महामार्गाच्या साईडपट्ट्या दुरूस्तीचे काम १५ दिवसांत करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. सोमवारपर्यंत हे खड्डे न बुजल्यास तसेच १५ दिवसांत साईडपट्ट्यांचे दुरूस्तीचे काम न झाल्यास शिवसेना यापुढे निवेदन देणार नाही. ठोकशाहीने उत्तर देईल. ‘नही’च्या अधिकाºयांनी वाटल्यास पोलीस बंदोबस्त घ्यावा, असा दम भरण्यात आला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव