शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी सुधरा... नियम पाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश काढून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात ...

एकीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी आदेश काढून नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडून त्याच तत्परतेने त्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शासन, प्रशासकीय यंत्रणा ही लोकांमध्ये जनजागृती करून ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेनंतर साथ आटोक्यात आली असे वाटत असतानाच बेफिकीरपणा वाढल्याने पहिल्या लाटेपेक्षाही अधिक अशी दुसरी लाट आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जिल्ह्यात दररोज हजार-बाराशे रुग्ण आढळून येत आहेत. गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांना ऑक्सिजनची गरज भासली तर ती यंत्रणाही तोकडी पडत आहे. सामाजिक संस्थांनी ही अडचण ओळखून पुढे येत मदतीचा हात दिला आहे. या सामाजिक संस्थांकडून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन लोकांना माफक शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळत आहे. कोविड सेंटर्सदेखील फुल्ल असल्याने मोहाडी येथील बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयात तातडीने व्यवस्था करीत मोठे कोविड केअर सेंटर प्रशासनाकडून सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे. जनतेच्या कराच्या पैशांमधूनच हा सर्व खर्च होत आहे. त्यामुळे जनतेनेही शासन, प्रशासनाकडून वेळोवेळी केले जाणारे नियम, आवाहन काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. शासन, प्रशासन हे नागरिकांचा जीव वाचविण्यासाठीच ही सर्व धडपड करीत आहे, हे जनतेला माहिती असतानाही व परिस्थिती गंभीर बनलेली असतानाही नागरिक मात्र बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. मास्क वापरण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र प्रत्येकजण सोयीने वागत असल्याने रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याचेच चित्र आहे. शेवटी शासन, प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांनाही एक मर्यादा आहे. ती जर नागरिकांनी लक्षात घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर नंतर बेड मिळाला नाही, ऑक्सिजन मिळाला नाही, रेमडेसिवीर सारखे महत्वाचे इंजेक्शन मिळाले नाही म्हणून जीव गमवायची वेळ येऊ शकते. प्रशासन रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी पावले उचलत आहेच, पण नागरिकांनी ते खरेदी करण्याची वेळच येणार नाही, अशीच खबरदारी घेतली तर काय हरकत आहे?