शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आहे त्या वृक्षांकडे दुर्लक्ष, नसलेल्या वृक्षांसाठी लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

रिॲलिटी चेक अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव परिसरात जे वृक्ष आहेत. ...

रिॲलिटी चेक

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव परिसरात जे वृक्ष आहेत. ते वाचविण्यासाठी कोणत्याही उपायोजना होत नाहीत, तर दुसरीकडे मात्र जिथे वृक्ष नाहीत त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येईल, त्यावर मात्र आतापासूनच लाखोंचा खर्च होत असल्याचे धक्कादायक चित्र मेहरुण तलाव परिसरात दिसून येत आहे.

मेहरूण तलाव परिसराचा विकास करण्यासाठी २०१८मध्ये पर्यटन विभागाकडून ५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यात आता काही कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये अशी कामे होत आहेत, की ज्या कामांचा उपयोग येत्या काही काळात नागरिकांना होणारच नाही. मेहरूण तलावाच्या मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष करून, ज्याची गरज नाही त्यावर मात्र लाखोंचा खर्च केला जात आहे.

वृक्ष लागवड करण्याआधीच ओटे तयार

मोठ्या ठेरेदार वृक्षालगत नागरिकांना बसण्यासाठी ओटा तयार करण्यात येतो. मात्र, मेहरूण तलावाच्या परिसरातील डेरेदार वृक्षांकडे दुर्लक्ष करून ज्याठिकाणी अद्याप वृक्षाची लागवडच करण्यात आलेली नाही. अशा ठिकाणी ओटे तयार करून घेतले जात आहेत. या ओट्यांचा फायदा कसा होईल ? हे सांगणेदेखील कठीण आहे. केवळ बांधकाम करायचे आणि बिले काढून मोकळे व्हायचे, असा प्रकार बांधकाम विभागात सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्या बांधकामाचा उपयोग नागरिकांसाठी होईल की नाही ? याचा विचारदेखील होताना दिसून येत नाही.

आहेत त्या वृक्षांकडे मात्र दुर्लक्ष

मेहरुण तलाव परिसरातील डेरेदार अनेक वृक्षांची मुळे उघडी पडू लागली आहेत. काही महिन्यांपूर्वी तलाव परिसरातील तीन ते चार वृक्ष कोसळले होते. या वृक्षांच्या उघड्या पडलेल्या मुळांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही तरतूद किंवा नियोजन होत नसताना दुसरीकडे मात्र इतर कामांवर लाखोंची उधळपट्टी केली जात आहे.

सुशोभिकरण नाही तर शुध्दीकरणाची गरज

मेहरूण तलावाच्या मुख्य समस्यांबाबत अजूनही प्रशासनाला जाग येताना दिसून येत नाही. मेहरूण तलावात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण निर्माण होऊन तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यावर उपाययोजना न करता बाहेरील देखाव्यावर मात्र खर्च होत आहे.

कोट....

अतिशय चुकीची पध्दत आहे. पार तयार करताना आधी वृक्षाचा बुंधा मोठा होऊ दिला जातो. मात्र, याठिकाणी तर वृक्ष नसतानाच ओटे तयार केले जात आहेत. यामागे केवळ पैसे खाण्याचे काम सुरू आहे. यावर आवाज उठविण्याची गरज आहे. याबाबत महापौर, आयुक्तांसह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल.

-सुजाता देशपांडे, भारती प्रतिष्ठान

मुळात मेहरूण तलाव परिसरात जे डेरेदार वृक्ष आहेत. ते वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, ज्याठिकाणी खर्च करण्याची गरजच नाही त्याठिकाणी खर्च करून निधीचा अपव्यय होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावाच लागेल. मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारे निधीची उधळपट्टी करणे चुकीचेच आहे.

-प्रणिलसिंह चौधरी, संचालक, योगी फाऊंडेशन