शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

संकटावर मात करण्या धैर्य दे.. सामर्थ्य दे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:43 PM

देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर ...

देव आणि दानवांचा लढा म्हणजे सात्विक आणि राक्षसी वृत्तींचा लढा, त्यानुसार पुराणामधे तश्या अनेक कथा आहेत, अन् त्यातून सुंदर संदेश पोहचवला आहे.त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता. त्याने तीन पुऱ्या वसवल्या. म्हणून त्याचे नाव त्रिपुरासूर. त्याने कपटाने देव लोकांचा अमृतकुंभ चोरून आणला. शत्रूपक्षाचे वैशिष्ठ असलेला अमृतकुंभ आता माझेजवळ आहे, त्रिपुरासुराचा अहंकार अतोनात वाढला. राक्षसी वृत्तीला यश पचवता येत नाही. कारण यशाचा कर्तेपणा ते स्वत:कडेच ठेवतात, उच्च शक्तीकडे सोपवत नाही.देव लोकांच्याकडे खळबळ माजली. अमृतकुंभाच्या सुरक्षेची चौकशी करण्यात आली. पण त्याचा तपास लागेना. देव लोकांकडील अमृतकुंभ आता आपल्याजवळ आहे, माझा कोणीही पराभव करू शकत नाही. शत्रूपक्षाला खिंडीत गाठण्याची हीच वेळ आहे, असे म्हणून त्रिपुरासुराने देवलोकांना युद्धाचे आव्हान दिले. भोलेनाथ महादेवाचे सैन्य आणि त्रिपुरासुराचे सैन्य तुंबळ युद्ध झाले. त्रिपुरासुराचे सगळे सैन्य मारले गेले युद्धात. परंतु अमृताच्या जोरावर सैन्य पुन्हा जिवंत झाले. पुन्हा युद्ध होऊन त्रिपुरासुराचे सैन्य मारले जाणे अमृताच्या जोरावर पुन्हा जिवंत होणे, असे वारंवार घडू लागले.देवांना शंका आली की, राक्षससेना वारंवार जिवंत होत आहे, शत्रुपक्षाकडेच अमृतकुंभ असावा, तपासाअंती कळले की, त्रिपुरासुराने अमृतकुंभ चोरून तो आपल्या गोशाळेत लपवून ठेवला आहे. भगवान विष्णूने गाय आणि ब्रह्मदेवाने वासराचे रुप घेतले. त्रिपुरासुराच्या गोशाळेत प्रवेश केला अन त्या गोमातेने आपल्या श्ािंगाने तो अमृतकुंभ फोडू टाकला.भोलेनाथाने शत्रूपक्षाला युद्धाचे आव्हान दिले. भयंकर युद्ध झाले. अमृतकुंभ नाहिसा झाल्यामुळे त्रिपुरासुराचे सैन्य पुन्हा जिवंत होऊ शकले नाही. त्रिपुरासूर घाबरून सैरावैरा धावू लागला. महादेवाने त्रिपुरासुराला धरले आणि नाश केला, तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा.त्रिपुरासुराच्या रुपाने आलेले घोर संकट भोलेनाथांच्या पराक्रमाने नाहीसे झाले. सर्वत्र दिव्यांची आरास करण्यात आली. महादेवासमोर कापूर लावला गेला. दीपमाळ सुशोभित करण्यात आली. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा केला जातो. यामुळेच सद्गुरूनाथांना प्रार्थना करावी की, आमच्या जीवनात जर काही संकटे-समस्या आली तर आम्हास धैर्य दे. संकटाला सामोरा जाण्याचे सामर्थ्य दे. आम्ही अखंड रामनामाचे अनुसंधान ठेवू. कारण सद्गुरूंचा निवास नामात आहे.- राया उपासनी, निजामपूरकर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव