शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:14 IST

गिरीश महाजन : परप्रांतियाबाबत शासन असंवेदनशील असल्याची टीका

जळगाव : महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात परत पाठविण्यास राज्य सरकार अंसवेदनशील ठरल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे व त्यांचे मंत्री हे घरात बसूनच निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.कोरोनावर मात करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी केद्र सुरू करण्याची मागणीही महाजन यांनी केली.यावेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.राज्यात कोरोनाचा कहर वाढला असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ घरात बसून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त शपथ विधीसाठी सहकुटुंब बाहेर पडत आहेत. तर इतर मंत्री फक्त घरात बसून सर्व बाईट देत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.कोरोनाला हरविण्यासाठी डॉक्टर्स, नर्स व पोलीस कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. असे असताना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकारमधील कुणीही मंत्री समोर येत नाही. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पॅकेज दिले असतानाही, त्याच्याशी समन्वय ठेवण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुढे काय होईल, ही भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले. राज्य सरकारकडून फक्त घोषणा सुरू आहेत. रुग्णांसाठी जागा नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, असे ते म्हणाले.खडसे यांना डावलल्याचा मुद्दा आता जुना-माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परिषद निवडणुकीत पक्षाने डावलल्याचा विषय आता जुना झाला आहे, त्यावर भाष्य नको, असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.-महाजन यांनी यावेळी परिवहन आयुक्तांशी मोबाईल वरुन संपर्क साधून परप्रांतियांचे ट्रक जळगावात न अडविण्याची मागणी केली.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव