शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

कोरोना आजारावर नियंत्रण मिळविण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:14 IST

गिरीश महाजन : परप्रांतियाबाबत शासन असंवेदनशील असल्याची टीका

जळगाव : महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात परत पाठविण्यास राज्य सरकार अंसवेदनशील ठरल्याची टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे व त्यांचे मंत्री हे घरात बसूनच निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.कोरोनावर मात करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी केद्र सुरू करण्याची मागणीही महाजन यांनी केली.यावेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.राज्यात कोरोनाचा कहर वाढला असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ घरात बसून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त शपथ विधीसाठी सहकुटुंब बाहेर पडत आहेत. तर इतर मंत्री फक्त घरात बसून सर्व बाईट देत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.कोरोनाला हरविण्यासाठी डॉक्टर्स, नर्स व पोलीस कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. असे असताना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकारमधील कुणीही मंत्री समोर येत नाही. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पॅकेज दिले असतानाही, त्याच्याशी समन्वय ठेवण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुढे काय होईल, ही भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले. राज्य सरकारकडून फक्त घोषणा सुरू आहेत. रुग्णांसाठी जागा नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, असे ते म्हणाले.खडसे यांना डावलल्याचा मुद्दा आता जुना-माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परिषद निवडणुकीत पक्षाने डावलल्याचा विषय आता जुना झाला आहे, त्यावर भाष्य नको, असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.-महाजन यांनी यावेळी परिवहन आयुक्तांशी मोबाईल वरुन संपर्क साधून परप्रांतियांचे ट्रक जळगावात न अडविण्याची मागणी केली.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव