शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘करिअर कट्ट्या’तून ज्ञान व मार्गदर्शनाची गंगोत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST

जळगाव : ‘मी मोठा अधिकारी किंवा उद्योजक होणार....’ असे आपण नेहमीच ऐकत असतो. अशी स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान ...

जळगाव : ‘मी मोठा अधिकारी किंवा उद्योजक होणार....’ असे आपण नेहमीच ऐकत असतो. अशी स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान व मार्गदर्शन मिळावे आणि प्रशासन, उद्योगात मराठी माणसाचा टक्का वाढावा या उद्देशाने खान्देशातील महाविद्यालयांमध्ये गेल्या काही महिन्यापासून ‘करिअर कट्ट्या’ची स्थापना करण्यात आली आहे. या करिअर कट्ट्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान व मार्गदर्शनाची गंगोत्री निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग खान्देशात राबविला जात आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, तसेच नवोदय शैक्षणिक संस्थेचे उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय दहिवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच प्राचार्य आणि करिअर कट्टा समन्वयकांची सहविचार सभा पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, प्र-कुलगुरू डॉ. बी.व्ही. पवार, डॉ. आर.एस. पाटील, डॉ. राजेंद्र अहिरे, डॉ. ए.पी. खैरनार, वाय़.व्ही. पाटील, संजयकुमार बारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये नव ज्ञानाची निर्मिती

करिअर कट्ट्याच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये नव ज्ञानाची निर्मिती होणार आहे, असे मार्गदर्शन करताना संतोष चव्हाण यांनी सांगितले, तर विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान व मार्गदर्शन देण्यासाठी करिअर कट्ट्याची स्थापना झाली असल्याचे मत यशवंत शितोळे यांनी मांडले. याचा यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम मोरे, आय़.यू. शेख, डॉ. जगदीश पाटील, डॉ. योगेश कोरडे, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, डॉ. अरुणा नेरे, डॉ. वंदना पाटील यांनी परिश्रम घेतले.

असे आहेत जिल्हा समन्वयक

‘करिअर कट्टा’ या उपक्रमाचे फेब्रुवारी महिन्यात उद्घाटन झाले़ प्रत्यक्षात मार्च महिन्यापासून उपक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक महाविद्यालयात या कट्ट्याची स्थापना करण्यात आली असून, दिवसातून दोन तास मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक महाविद्यालयात समन्वयक नेमण्यात आले असून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात धुळे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. सचिन नांद्रे यांची, तर नंदुरबार जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. किरण मराठे व जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. विजय तुंटे यांचा समावेश आहे.

४०० विद्यार्थ्यांची होणार निवड

या उपक्रमांतर्गत ‘उद्योजग व आयएएस आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम घेतला जात आहे. त्यात विविध क्षेत्रांतील उद्योजक व आयएएस अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे, चारशे विद्यार्थ्यांची निवड ही या उपक्रमातून केली जाईल. या चारशे विद्यार्थ्यांना दिल्लीतील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.