शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आगामी दोन आठवड्यात उष्णतेच्या लाटेसह पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST

पारा ४५ अंशांचा पार जाण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. ...

पारा ४५ अंशांचा पार जाण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या तापमानात चांगलीच वाढ होत आहे. जळगाव शहराचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचला असून, पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. २३ ते २८ एप्रिल जिल्ह्यात तापमानाचा कहर निर्माण होण्याची शक्यता असून, या काळात तापमान ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तसेच काही दिवस ढगाळ वातावरण कायम झाल्याने तापमानातदेखील घट झाली होती. शहराचा पारा गेल्या आठवड्यात ३८ अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र पुन्हा तापमानात वाढ होऊन तापमान आता ४१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. उत्तर भारतातील राजस्थान व गुजरात या भागाकडून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. यामुळे लूसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, तापमान या हंगामातील उच्चांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत तापमान वाढले तर दुपारच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीअंशी चाप बसतो. मात्र तापमानाचा वाढीमुळे कोरोना सोबतच नागरिकांना उष्माघाताचा धोकादेखील वाढला आहे. यामुळे नागरिकांनी काही दिवस घरातच राहून बाहेर विनाकारण फिरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान सर्वाधिक तापमान

शहरात सकाळी ९ वाजेपासूनच तापमानात वाढ होत असून, रात्री ८ वाजेपर्यंत उष्ण झळांनी नागरिकांना घरात बसणेदेखील कठीण झाले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता शहराचा पारा सर्वाधिक ४१ अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे या काळात नागरिकांनी घरातच थांबण्याची गरज आहे. यासोबतच शहरात गेल्या आठवडाभरापासून ताशी १२ ते १४ किमी उष्ण वारे वाहत असून, यामुळेदेखील उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घरातून निघताना कानावर रुमाल लावूनच निघाले असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मे महिन्यात मात्र अवकाळीचे संकट

एप्रिलअखेरपर्यंत जिल्ह्यात तापमानाचा कहर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, तर १ मेनंतर पुन्हा जिल्हाभरात अवकाळी पावसाचा अंदाजदेखील वर्तवण्यात आला आहे. जागतिक हवामानात बदल होत असल्याने त्याचा परिणाम वातावरणाचा हंगामावर होताना दिसून येत आहे. तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढून चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, यामुळे जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मेअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.