शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात 60 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: June 19, 2017 15:51 IST

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये स्थिती बिकट : पुन्हा बियाणे खरेदी करावे लागणार, शेतकरी अडचणीत

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.19 : जिल्हाभरात 7 ते 11 जून यादरम्यान आलेल्या कमी अधिक पावसात कडधान्य, तृणधान्य व गळीत धान्याची पेरणी केलेल्या जवळपास 60 हजार हेक्टवरील पिके (अंकुर) पावसाअभावी जळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रावर दुबार पेरणी निश्चित मानली जात असून, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. 
जिल्हाभरात एक लाख 80 हजार हेक्टरवर पेरणी झाली. त्यात एकटय़ा कापसाचे क्षेत्र एक लाख 42 हजार हेक्टरवर आहे. उर्वरित म्हणजेच जवळपास 38 हजार हेक्टरवर ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिके आहेत. त्यात मक्याची सर्वाधिक 12 हजार हेक्टरवर पेरणी झाली. त्यापाठोपाठ सोयाबीनची नऊ हजार हेक्टवर पेरणी झाली आहे.
पूर्वहंगामी कापूस वगळता इतर पिके धोक्यात
एक लाख 42 हजार हेक्टरपैकी 60 हजार हेक्टवरील पिके ही कोरडवाहू आहेत. ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उर्वरित म्हणजेच 82 हजार हेक्टवर पूर्वहंगामी (बागायती) कापूस आहे. या कापसाचे सिंचन होत असल्याने त्याला धोका नाही. पण 60 हजार हेक्टवरील पिके काही भागांचा अपवाद वगळता पूर्णत: धोक्यात आली आहेत. जळगाव, धरणगाव, एरंडोल, भुसावळ आणि यावल तालुक्याच्या जळगावनजीकचा भाग या क्षेत्रात पिकांची अवस्था नाजूक बनली आहे.