शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

दोनही आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क... आम्हाला त्या आठवणींचा प्रचंड अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२९ च्या सुमारास आसोदा, ता. जळगाव येथे भेट दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२९ च्या सुमारास आसोदा, ता. जळगाव येथे भेट दिली होती. यावेळी त्यांचे स्वागत करणारे आमचे आजोबा दगाजी पाटील, दुसरीकडे वाघाडी, ता. शिरपूर येथील आईचे वडील जहांगीरदार पवार यांचा एका खटल्यानिमत्त बाबासाहेबांशी संपर्क आला. आमच्या नातेवाइकांकडून या आठवणी ऐकल्या आहेत. आज या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे, अशा भावना मूळचे आसोदा येथील रहिवासी व सध्या धुळे येथे स्थायिक असलेले प्रकाश भास्करराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रकाश पाटील वय ६७ हे गेल्या ५० वर्षांपासून धुळे येथे अभियंता म्हणून स्थायिक आहेत. त्यांचे मूळ गाव हे आसोदा, ता. जळगाव. या गावातील दगा मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेले दगाजी श्यामराव पाटील हे त्यांचे आजोबा व त्यांच्या आजोबांचे काका दौलतराव पाटील यांनी आसोदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले होते. तो क्षण थेट आजोबांकडून ऐकायला मिळाला नाही. आजोबांचे आम्ही लहान असतानाच निधन झाले. मात्र, काका व आजींकडून या ऐतिहासिक आठवणी आम्ही ऐकल्या आहेत. थोर व्यक्तिमत्त्वाशी आमच्या आजोबांचा आलेला संपर्क आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रकाश पाटील सांगतात. शिवाय आसोद्याच्या या ऐतिहासिक भेटीबाबत साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल यांनीही भेटीदरम्यान आपल्याशी चर्चा केल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.

शिरपूरच्या खटल्यासंदर्भात संपर्क

वघाडी हे आमच्या आईच्या वडिलांचे गाव. जहांगीरदार पवार. वाघाडी येथील आमच्या मामांकडून ऐकल्यानुसार बैलपोळ्याच्या एका वादासंदर्भातील खटला लढविण्यासाठी बाबासाहेब धुळे येथे आले होते. त्यावेळी आमच्या आजोबांचा बाबासाहेबांशी संपर्क आला होता. त्यावेळी मामांनी या आठवणी सांगितल्या होत्या. बाबासाहेबांना ते कसे घ्यायला गेले होते, कोर्टात खटला कसा चालला, अशा आठवणी ऐकल्यानंतर आजही अगदी डोळ्यासमोरच असल्याचा भास देऊन जातात. धुळे येथील कंवर वकील यांचे पणजोबा यांनी त्यावेळी बाबासाहेबांचे सहायक म्हणून काम पाहिले होते. वकिलपत्रावर त्यांचीही स्वाक्षरी आहे, असेही प्रकाश पाटील यांनी सांगितले.

आजोबा पुरोगामी विचारांचे

आजोबा दगाजी पाटील यांची विचारसरणी ही पुरोगामी हाेती. त्यांनी आमच्या सर्व कुटुंबावर समानतेचे संस्कार केले. जात-पात हा विषयच कधी आमच्यात आला नाही, आम्ही तसा कधी विचारही केला नाही, असेही प्रकाश पाटील सांगतात.