शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

करंज येथील शेतकऱ्याची केळी इराणला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे केळीला बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच, दुसरीकडे या खडतर परिस्थितीवर मात करून जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याने केळीचे पीक घेऊन थेट अरब देशांमधील इराणला आपली केळी रवाना केली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विदेशामध्ये निर्यातीद्वारे नवा मार्ग सापडला आहे.

जळगाव तालुक्यातील करंज येथील प्रदीप शांताराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील केळी शुक्रवारी इराण येथे रवाना झाली. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी त्रस्त झाला असताना आता काही प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी निर्यातीचा पर्याय उपलब्ध झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी करंज येथे जाऊन प्रदीप पाटील यांचे कौतुक केले. त्यांचा आदर्श घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम केळीची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. गजानन ॲग्रो, पोलन ॲग्रो मिनरल व धर्ती कृषी संवर्धन यांच्या केळी विदेशात पाठविण्यात येणार आहेत. याप्रसंगी सौरभ चौगुले, योगेश जिंदमवर, संग्राम कुरणे, तसेच गावातील प्रतिष्ठित शेतकरी रामदास पाटील, हिलाल पाटील, अनिल सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील, संजय सपकाळे, सुनील सपकाळे, शरद पाटील, सुरेश सपकाळे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात जळगावच्या केळीला मागणी

जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध असून, काही वर्षांपर्यंत जिल्ह्यातील केळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात व उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये निर्यात केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये जळगावच्या केळीला नवी ओळख मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्येदेखील मोठी मागणी वाढली आहे. विशेष करून अरब देशांमध्ये केळीची मागणी वाढली आहे. सौदी अरब, इराण, अफगाणिस्तान, कुवेत, कतार या देशांमध्ये केळीला मोठी मागणी आहे. दरम्यान, भारतातील ईशान्येकडील राज्य जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येदेखील जिल्ह्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. देशांतर्गत बाजार व आंतरराष्ट्रीय बाजारात केळीला मागणी असतानादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोर्ड भावानुसार भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.