शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील 101 दारू दुकानांना फटका

By admin | Updated: March 17, 2017 00:12 IST

500 मीटरच्या आत निर्णय : कारवाईबाबत अद्याप अनभिज्ञता, केवळ सर्वेक्षण

नंदुरबार : राष्ट्रीय व राज्य मार्गाच्या 500 मीटर अंतराच्या आत असलेल्या जिल्ह्यातील 101 बिअरबार व दारू दुकानांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात सव्र्हे करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. दरम्यान, अशी दुकाने व बिअरबार बंद करण्यासंदर्भात अद्याप शासनाकडून कुठलेही मार्गदर्शन किंवा आदेश आले नसल्यामुळे सध्या कारवाई थंड बस्त्यात असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर होणा:या अपघातांची संख्या व त्याला कारणीभूत दारू पिऊन वाहन चालविणे यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. अनेकजण जायबंदी झाले आहेत. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन अखेर महामार्गावरील 500 मीटरच्या आत असलेल्या सर्वच दारू दुकाने व बिअरबार यांना हटविण्याचे आदेश शासनाला दिले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिनाभरात प्रक्रिया राबविली. सुरुवातीला शासनाने केवळ अशा दुकानांचे व बारचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने सव्रेक्षण करून अहवाल सादर केला आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गावर 20 तर राज्य महामार्गावर 81 बिअरबार व दारू दुकाने असल्याचे स्पष्ट झाले आहे.सर्वाधिक अपघात नंदुरबार जिल्ह्यातून चार राज्य मार्ग, तर एक राष्ट्रीय महामार्ग जातो. गेल्या दीड वर्षातील अपघातांची संख्या लक्षात घेता 80 टक्के अपघात हे या पाच महामार्गावर झालेले आहेत. त्यात जवळपास 122 जणांचा बळी गेला आहे, तर 800 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. सर्वाधिक अपघात प्रवण क्षेत्र हे कोंडाईबारी ते नवापूर व वडाळी ते अक्कलकुवा हे क्षेत्र ठरले आहेत. या दोन्ही महामार्गावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. परंतु रस्ते जेवढे आहेत तेवढेच कायम राहिेले आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या दोन्ही रस्त्यांवरील दारू आणि बिअरबारची दुकाने लक्षात घेता त्यामुळेदेखील अपघातांचे प्रमाण वाढल्याचे समोर येते. राज्य व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच जिल्ह्यातून गेलेल्या अनेक जिल्हा मार्गावरील स्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे कारवाई करताना जिल्हा मार्गावरील अर्थात सर्वाधिक रहदारी असणा:या अशा रस्त्यांवर बिअरबार व दारू दुकानांवर  कारवाई करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.कारवाईचे अधिकारअशा दुकानांवर कारवाईचे अधिकार हे राज्य उत्पादन शुल्क विभागाला की पोलीस विभागाला असतील याबाबत शासनाकडून पाहिजे तशा सूचना किंवा मार्गदर्शन आलेले नाही. अवैध दारू रोखण्याचे अधिकार जसे राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांनाही आहे तसेच अधिकार अशा दुकानांवर कारवाई करण्याचे असतील का? की दोन्ही विभाग एकमेकांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप होतो म्हणून ओरड करतील, याबाबतही शासनाने स्पष्ट आदेश करणे आवश्यक आहे. मंदिर, न्यायालये, शाळा यांच्यासमोर दारू दुकाने किंवा बिअरबार नसावे असेही नियम आहेत. परंतु नंदुरबारसह अनेक भागातील चित्र पाहिले तर अनेक ठिकाणी ते दिसून येतील. त्यासाठी प्रवेशद्वार विरुद्ध दिशेला दाखवून वेळ निभावून नेली जाते. त्यामुळे महामार्गावरील दारू व बिअरबारची दुकानेदेखील अशा पळवाटा शोधणार नाहीत हे कशावरून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.महिनाभरात कारवाई शक्ययेत्या महिनाभरात कारवाई शक्य असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. सर्व जिल्ह्यांना आधीच सर्वेक्षण करून अशा दुकान व बिअरबारची संख्या, ते कुठे आहेत. कोणत्या रस्त्यांवर किती आहेत याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. अहवालानंतर उत्पादन शुल्क विभागातर्फे आता थेट कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.चार राज्य व एक राष्ट्रीय मार्गजिल्ह्यातून चार राज्य मार्ग, एक आंतरराज्य मार्ग व एक राष्ट्रीय महामार्ग जातो. पैकी नंदुरबार-दोंडाईचा, सोनगीर-शहादा-धडगाव, शेवाळी-नंदुरबार-अक्कलकुवा व विसरवाडी-नंदुरबार-सेंधवा या राज्य मार्गाचा समावेश आहे. ब:हाणपूर-अंकलेश्वर हा आंतरराज्य मार्ग तर नागपूर-सुरत हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या सर्व महामार्गावरील व राज्य मार्गावरील दारू दुकाने आणि बिअरबारचा सव्र्हे करण्यात आलेला आहे.या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अपघातांचे प्रमाणदेखील कमी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असले तरी या निर्णयाची अंमलबजावणी करणा:या यंत्रणेवरदेखील बरेच काही अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने आता या निर्णयाकडे पाहिले जात आहे.