शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच मोबाईल करा बंद; झाडांपासून राहा दूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : पावसाळा म्हटले की, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा एक भाग असतो. विजा चमकताना सहसा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : पावसाळा म्हटले की, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा एक भाग असतो. विजा चमकताना सहसा मोबाईल बंद करणे गरजेचे असून, झाडाखाली न थांबण्याची गरज आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आकाशातील वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषकरून गुरांच्या मृत्यूचे प्रमाण हे लक्षणीय असल्याचे दिसून येते. पाऊस आला की, रानातील गुरेही पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबतात आणि नेमकी तेथेच वीज पडते. यामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनेक गुरांचे गोठे झाडाखाली असतात.

कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई

n शासनाने नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या मनुष्य आणि जनावरांसाठी याआधीच तरतूद केली आहे.

n त्यानुसार वीज पडून मनुष्याचा मृत्यू झाल्यास वारसांना एक लाख रुपये, तर जनावरांच्या मालकांना ५० आणि २५ हजार रुपये अनुदान मिळते.

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...

ज्यावेळी ढगांमध्ये विजांचा कडकडाट होतो, त्यावेळी शक्यतो कुठल्याही झाडाखाली थांबू नये. तसेच मोबाईलचा वापर न केलेलाच चांगला, अशा सूचना आहेत; परंतु याकडे अनेकजण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

कोट

राज्य सरकारने वीजरोधक यंत्रणा बसविण्यासाठी आता विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यास मदत होणार आहे.

- डॉ. संजय लाखे-पाटील, जालना

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?

१. जालना जिल्ह्यात जवळपास १८ वेगवेगळ्या ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

२. आपत्ती निवारण विभागाकडून पावसाळा सुरू झाल्यावर सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात.

३. अनेक वेळा पावसापासून बचावासाठी शेतकरी अथवा गुरे चारणारे हे झाडाखाली उभे राहतात, ते टाळले पाहिजे.