शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग बनतोय 'मृत्यूचा मार्ग'! जालना जिल्ह्यात वर्षभरात ६ अपघातांत १४ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:19 IST

सावधान! समृद्धीवर 'हायवे हिप्नोसिस'चा धोका; जालना जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीने प्रशासनाचे धाबे दणाणले.

जालना : वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गजालना जिल्ह्यासाठी गेल्या वर्षभरात मृत्यूचा सापळा ठरत आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च या वर्षभराच्या कालावधीत जालना जिल्ह्याच्या हद्दीत झालेल्या ६ भीषण अपघातांमध्ये १४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वेग आणि डुलकीमुळे अपघात
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या कारणांचा शोध घेतला असता, प्रामुख्याने मानवी चुका आणि तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. सरळ आणि गुळगुळीत रस्ता असल्याने वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नाही. मात्र, हाच अतिवेग अनेकदा नियंत्रणाबाहेर गेल्याने उलटल्याचे प्रमाण वाढले आहे.

अपघाताची 'पंचसूत्री' : का जाताहेत जीव?
हायवे हिप्नोसिस: तासनतास एकसारख्या रस्त्यावर गाडी चालवल्याने चालकाची एकाग्रता भंग पावते आणि त्याला डुलकी लागते. यालाच तांत्रिक भाषेत 'हायवे हिप्नोसिस' म्हणतात. जालन्यातील अनेक अपघातांत हेच प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.

टायरची 'एक्स्पायरी': सिमेंटच्या रस्त्यामुळे टायर गरम होऊन फुटण्याचे प्रमाण मोठे आहे. जुने टायर वेगाने धावताना उष्णता सहन करू शकत नाहीत आणि भीषण स्फोट होऊन गाडी पलटी होते.

लेन शिस्तीचा अभाव: महामार्गावर ठराविक लेनमधून गाडी चालवणे बंधनकारक असताना, अनेक चालक अचानक लेन बदलतात किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतात.

वन्यप्राण्यांचा अडथळा: महामार्गाच्या कडेला असलेल्या जंगलातून वन्यप्राणी अचानक रस्त्यावर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडले आहेत.

घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंय
समृद्धीवरून प्रवास करताना दर दोन तासांनी विश्रांती घ्यावी. टायरमध्ये नायट्रोजन हवेचा वापर करावा आणि वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे. समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आम्ही गस्त वाढवली आहे. मात्र, चालकांनी स्वतःहून शिस्त पाळणे गरजेचे आहे. डुलकी येत असेल तर जबरदस्तीने गाडी चालवू नका, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Samruddhi Mahamarg: 'Highway of Death' Claims 14 Lives in a Year

Web Summary : The Samruddhi Mahamarg in Jalna district has become a death trap, claiming 14 lives in six accidents within a year. Accidents are attributed to speeding, driver fatigue ('highway hypnosis'), tire bursts due to heat, lack of lane discipline, and wildlife crossings. Authorities urge drivers to take breaks and follow speed limits.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाAccidentअपघात