शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
4
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
5
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
6
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
7
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
8
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
9
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
10
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
11
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
12
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
13
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
14
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
15
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
16
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
17
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
19
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
20
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने दिलेलं आरक्षण चांगलं, पण ५० टक्क्यात नसल्याने टिकणार नाही- मनोज जरांगे पाटील

By विजय मुंडे  | Updated: July 12, 2024 20:23 IST

'मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास सिद्ध केलं.'

विजय मुंडे, जालना : सरकारने दिलेलं आताचं १० टक्के आरक्षण चांगलं आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या १० टक्के मागास सिद्ध केलं आहे. परंतु, मिळालेलं आरक्षण ५० टक्क्यांच्या आत नसल्याने ते टिकत नाही. म्हणून त्याला विरोध आहे. दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आम्ही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मागत आहोत. शासनाला एक महिन्याची मुदत दिली असून, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आमच्या व्याख्येनुसार करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जालना शहरात शुक्रवारी मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोपप्रसंगी जरांगे पाटील यांनी उपस्थित समाज बांधवांना संबाेधित केले. २००१ आणि २०१२ च्या कायद्यात सुधारणा करून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केवळ मराठ्यांसाठी नाही. त्या कायद्यात दुरूस्ती केली तर केवळ मराठा समाजच नव्हे तर सर्व जातीधर्मासाठी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजप आणि काँग्रेसमुळे ७० वर्षापासून रखडला आहे. १६ टक्के आरक्षण राणे समितीने दिले ते उडाले. १३ टक्के आरक्षण दिले ते उडविले आता १० टक्के दिले आहे. लोकसंख्या वाढत असताना मात्र दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचा टक्का कमी केला जात आहे. आताचे आरक्षण चांगले आहे. परंतु, आताचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत नसल्याने ते टिकणार नाही. त्यामुळे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याच्या आधारे राज्यातील मागेल त्या मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, हैदराबाद संस्थान, सातारा संस्था, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे, ८३ क्रमांकावर कुणबी व मराठा एकच आहे त्याचा आधार घेवूनच कायदा केला आहे. त्या कायद्यातील अटीशर्थी कमी करून सुलभता आणावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

नेत्यांनो, येड्यात काढू नका

महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो मराठ्यांची लेकरं मोठी व्हावीत, असे कोणालाच वाटत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून कोणीच बोलत नाही. आता नवीन डाव सुरू केलाय आम्ही बैठक बोलाविली तर तुम्ही येवू नका. नेत्यांनो येड्यात काढू नका. आतापर्यंत पाडा म्हटले हाेते. आता नाव घेतले तर... असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. उमेदवारीसाठी रांग लावणाऱ्यांवरही जरांगे पाटील यांनी निशाना साधला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण