शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शिक्षकांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 1:00 AM

शिक्षणाला अच्छे दिन नव्हे तर चांगले दिवस नक्की येतील, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी गुरूवारी जि.प.मध्ये आयोजित शिक्षक दरबार कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी शिक्षकांनी आपल्या अनेक समस्यांचा पाढा आ. काळे यांच्यासमोर वाचला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या पाच वर्षात शिक्षणाला अच्छे दिन आले होते. कधी नव्हे एवढे जीआर मागील सरकारने काढले. जीआर काढणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सरकारनेच घरी बसवले. जेवढे जीआर काढले त्यापैकी एकही जीआर शिक्षकांच्या फायद्याचा ठरला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शिक्षणाला अच्छे दिन नव्हे तर चांगले दिवस नक्की येतील, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी गुरूवारी जि.प.मध्ये आयोजित शिक्षक दरबार कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी शिक्षकांनी आपल्या अनेक समस्यांचा पाढा आ. काळे यांच्यासमोर वाचला.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, सभापती दत्ता बनसोडे, जि.प. सदस्य जयमंगल जाधव, सोपान पाडमुख, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी तांगडे, उपशिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्यासह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.पुढे बोलताना आ. काळे म्हणाले, सध्या खाजगी शाळाच्या अनुदानाचा प्रश्न भेडसावत आहे. आमच्या सरकारने १०० टक्के अनुदान दिले होते. परंतु, भाजप सरकारने २० टक्केच अनुदान दिले. त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून १०० टक्के अनुदानाची मागणी करण्यात येत आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार शाळांना टप्प्याने अनुदान देणार नसून १०० टक्के अनुदान देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशी मागणी आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार आहोत. जुन्या पेन्शन योजनेसाठी असलेल्या जाचक अटी हटवून १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.चट्टोपाध्याय निवड श्रेणीची प्रकरणे जिल्हा परिषदस्तरावरच निकाली काढण्यात येतात. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चट्टोपाध्याय निवड श्रेणीची प्रकरणे निकाली काढावीत. शिक्षणाधिकाऱ्यांनी या कामी हलगर्जीपणा करू नये, असेही ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांची वैद्यकीय देयके प्रलंबित आहे. अनेक शिक्षक वैद्यकीय देयके निकाली काढण्याची मागणी करतात. परंतु, अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित असलेली शिक्षकांची देयके निकाली काढावी. अधिका-याने सेवा संपल्यानंतरही आपले नाव निघेल, असे काम करावे. जिल्ह्यात विद्यार्थीं संख्या नसतानाही ६ वी, ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.हे वर्ग तात्काळ बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. या प्रश्नाकडे उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, असे सांगून ते म्हणाले की, लवकरच रिक्त पदेही भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षकांनी मांडल्या समस्याआमदार विक्रम काळे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर शिक्षकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. शिक्षक विलास इंगळे यांनी सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न मांडला. ते म्हणाले की, अर्ज करूनही मला ‘क’ वर्गात घेण्यात येत नाही. अनेकवेळा अर्ज केला. परंतु, याकडे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आ. काळे यांनी शिक्षणाधिका-यांना ३० जानेवारीच्या आत सुनावणी घेऊन विलास इंगळे यांना ‘क’ वर्गात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर इतर शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या.

टॅग्स :Vikram Kaleविक्रम काळेTeachers Councilशिक्षक परिषद