शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय फायद्यासाठी जातीय विषमता निर्माण केली जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

वडीगोद्री : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांचे नेतृत्व करावं अशी इच्छा छत्रपती शाहू महाराज व्यक्त करत असत. तर माझी ...

वडीगोद्री : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांचे नेतृत्व करावं अशी इच्छा छत्रपती शाहू महाराज व्यक्त करत असत. तर माझी जयंती साजरी करू नका परंतु आपल्याला आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांची जयंती साजरी करावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत असत. महाराष्ट्रात असा जातीय एकोपा होता. अलीकडे मात्र ठराविक राजकीय नेते त्यांच्या राजकीय फायद्यासाठी मुद्दामहून जातीय विषमता निर्माण करतात, असा घणाघाती आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला.

अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी रात्री छत्रपती संभाजीराजे यांनी भेट देवून पाठींबा दिला. आपले पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांनी फक्त मराठ्यांचं राजकारण केला असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांनी तसे केले नाही. अठरापगड जातींना व बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शाहू महाराजांनी करवीर संस्थानात १९०२ मध्ये बहुजनांसह, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना आरक्षण दिले. असा समतेचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

या महाराष्ट्रात दलित, सुवर्ण वाद नसतो, ओबीसी मराठा वाद नसतो पण अलीकडे काही नेते हा वाद मुद्दाहून निर्माण करतात. आरक्षणावरून जातीय विषमता वाढवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मराठा समाजाला आधी शाहू महाराजांच्या काळात आरक्षण होते. १९६७ साली केंद्रीय ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले होते. मात्र १९६८ मध्ये ते रद्द करण्यात आले. आपला समाज हा सामाजिक मागास आहे. त्याचे सामाजिक मागासलेपण सिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयाने ते वैध ठरवले आहे. असे असतानाही हा विषय सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिली हे दुर्दैवी आहे. ५० टक्क्यांच्या वरती देशातील २३ राज्यात आरक्षणाची टक्केवारी वाढली आहे. मग तेथील आरक्षणाला स्थगिती का नाही? केवळ आणि केवळ महाराष्ट्रातच मराठा आरक्षणाला स्थगिती का? असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

पंचतारांकीत हॉटेलमध्ये बसून प्रश्न सुटणार नाही

८ मार्च पासून सुरू होत असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी कडे सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे. यात महाराष्ट्र सरकारची भूमिका फार महत्त्वाची आहे. राज्याने निष्काळजीपणा करून चालणार नाही. मुंबईत पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून हा प्रश्न सुटणार नाहीत. सुप्रीम कोर्टात भक्कम पणे आरक्षणाची बाजू मांडली नाही. तर यास महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे. चांगले वकील नियुक्त केले. त्याबद्दल सरकारचे स्वागत आहे. परंतु वकिलावर विसंबून न राहता समाजाला विश्वासात घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.