शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पान एकचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना ...

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना परिस्थितीनंतर शासनाने अनेक बाबतीत निर्बंध ठेवले आहेत. यातच हॉटेल आणि ढाबा यांना वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळेच नवीन वर्षाचे स्वागताला उत्तर रात्रीच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत.

स्मशानभूमीसाठी आरक्षण

जालना : शहराचा वाढलेला विस्तार आणि चोहोबाजूने वाढलेले शहरीकरण पाहता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह नगर पालिकेने शहराच्या चारही बाजूने नवीन व अद्ययावत स्मशानभूमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यापैकी डीपीमध्ये दोन ठिकाणी स्मशानभूमीसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर दोन ठिकाणी जागांचा शोध घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून स्मशानभूमीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

मुख्य जलवाहिनी फुटली ; पाणी वाया

भोकरदन : शहरातील बसस्थानक प्रवेशद्वाराजवळील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत. या गळतीमुळे बसस्थानक परिसरात रस्त्यावरच पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भोकरदन शहरासाठी दानापूर येथील जुई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या योजनेच्या पाईलाईनची व्यवस्थित देखभाल केली जात नाही.

संगणकीय प्रणाली योजनेला मुदतवाढ

वडीगोद्री : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योनजा या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शासनाने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहेत. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबीकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

साष्टपिंपळगावात आरक्षणासाठी आंदोलन

अंकुशनगर : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, आरक्षणाअभावी सुशिक्षित तरूणांमध्ये नैराश्य पसरले आहे. केंद्र सरकारने एक विचाराने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. या निवेदनावर संजय कटारे, ज्ञानेश्वर बोचरे, उमेश औटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.