शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमा तुझा रंग कसा?... चार महिन्यात २३ खून; जीव ओवाळून टाकणारेच वैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:01 IST

प्रेमात सुरुवातीला सोबतच जगायचे अन् सोबतच मरायचे, असे वचन एकमेकांना दिले जाते. परंतु, याच नात्यात दरी निर्माण झाल्यावर एकमेकांचा जीव घ्यायला देखील मागेपुढे पाहत नाहीत.

जालना : प्रेमाला वय, जात, धर्म, गरीब, श्रीमंत अशी कुठलीच बंधने नसतात. मात्र, शंका, गैरसमज, संशयातून प्रेमाची जागा टोकाच्या द्वेषाने घेतल्याची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षांत समोर आली आहे. ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, त्यालाच संपविण्याची मानसिकता बनत चालली आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत तब्बल २३ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यात चारित्र्याच्या संशयावरून पाच जणांचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.

प्रेमात सुरुवातीला सोबतच जगायचे अन् सोबतच मरायचे, असे वचन एकमेकांना दिले जाते. परंतु, याच नात्यात दरी निर्माण झाल्यावर एकमेकांचा जीव घ्यायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. काहीवेळा आत्महत्येसारख्या घटनांनी प्रेमाचा शेवट झाल्याचे पाहावयास मिळाले तर, कधी-कधी हत्येचा थरार देखील झालेला आहे. काही वेळा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला संपविले जाते. काही वेळा प्रियकराचा काटा काढला जातो, तर पत्नी आणि प्रियकर मिळून पतीचा काटा काढतात. गेल्या चार महिन्यांत जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुनाच्या घटना घडल्या आहेत. जवळपास २३ खून झाले आहेत. यात पाच खून हे चारित्र्याच्या संशयावरून झाल्याचे समोर आले आहे. त्यातच गेल्या सात दिवसांत तब्बल चार खून झाले आहेत. यामुळे जिल्हा हादरला आहे.

गेल्या दीड वर्षभरात प्रेमासाठी घडलेल्या घटना१) अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाचा खून आईनेच तिच्या प्रियकरासह अन्य एकाच्या मदतीने केला. चिमुकल्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून आणि गळा चिरून खून करण्यात आला होता. ही घटना अंबड तालुक्यातील डावरगाव येथे घडली होती. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. प्रेमामुळे आपल्या मुलाचा आईने जीव घेतला होता.२) कुंभारपिंपळगाव येथील एका तरुणीने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.३) पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून रोहिदास लक्ष्मण खरात (४०) यांचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे दोन महिन्यांपूर्वी घडली होती.४) चारित्र्यावर संशय घेत पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून माय-लेकीचा खून केल्याची घटना जालना शहरातील सोनलनगर परिसरात सोमवारी सकाळी उघडकीस आली. भारती गणेश ऊर्फ संजू सातारे, वर्षा सातारे अशी मृत माय-लेकींची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाDeathमृत्यू