शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीवरील लष्करी अळीने शेतकरी झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:17 IST

मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदाचे वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकटाचे ठरले. खरिप हंगामात पाऊस नसल्याने उत्पादन घटले असून, नंतर हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शासनाकडून हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते. अनेक शेतकऱ्यांनी याची काळजी घेतली. परंतु मोठ्या प्रमाणावर हा हल्ला झाल्याने ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप आणि रबी हंगामातही पाहिजे तेवढे उत्पन्न मिळणार नसल्याचे वास्तव आहे. यामुळे शेतक-यांची दुहेरी कोंडी झाली आहे. यंदा सोयाबीनचा दर्जाही घटल्याने भाव पाहिजे तेवढा मिळत नसल्याने मिळेल त्या दराने शेतकरी सोयाबीन विक्री करत आहे. काही मोजक्या शेतक-यांकडे आता सोयाबीन शिल्लक असून, ज्यांच्याकडे दर्जेदार सोयाबीन आहे, अशा शेतकºयांना तीन हजार ४०० ते तीन हजार ७०० रूपयांचा दर मिळत आहे.
जालना जिल्ह्यात सीसीआयने चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रावर आता कपाशीची चांगली आवक आली असल्याची माहिती सीसीआयचे अधिकारी ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, अद्याप शेतात मोठ्या प्रमाणावर कापूस वेचणीअभावी पडून आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद तसेच खासगी संस्थांमधील विद्यार्थी हे शाळेत येण्याऐवजी थेट शेतात जाऊन कापूस वेचत असल्याने शाळेच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम होत असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
४१८ कोटीची गरज
जालना जिल्ह्यातील परतीच्या पावसाने जवळपास चार लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना जुन्या निकषानुसार जरी मदत द्यायची असली तरी त्याची रक्कम ही जवळपास ४१८ कोटी रूपये होते. या पैकी पहिला हप्ता म्हणून केवळ ११० कोटी रूपयेच मिळाले असून, उर्वरित रक्कम कधी मिळेल, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी