शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगीतून सलग ५ विजय; गतवेळी मतविभाजनाने तारले, यावेळी राजेश टोपेंना जड जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 20:07 IST

पाचवेळा आमदार तरी मतदार संघाच्या विकासाचे काय? जिल्ह्यात पक्ष देखील मजबूत झाला नाही

जालना : आजवरच्या निवडणुकांचा निकाल पाहता एखादा अपवाद पाहता मतविभाजनामुळे आ. राजेश टोपे यांना विजयाचा गुलाला उधळता आला आहे. परंतु यंदाची निवडणूक टोपे आणि समर्थकांना वाटते तितकी सोपी नाही. टोपेंविरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. विशेषत: यंदाच्या निवडणुकीत टोपे यांना सामाजिक नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, असे जाणकरांना वाटते.

१९९९ ते २०१९ या कालावधीत घनसावंगी (पूर्वीचा अंबड) मतदार संघातील मतदारांनी सलग पाच वेळा आमदार काम करण्याची संधी राजेश टोपे यांना दिली आहे. घनसावंगीचे आमदार आणि राज्य मंत्रीमंडळात मंत्री म्हणूनही टोपे यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. २५ वर्षे प्रमुख पदावर असतानाही मतदार संघातील रस्ते, पाणी आणि विजेचा प्रश्न पूर्णपणे सोडविण्यात आ. टोपे यांना अपयशच आल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. विशेषत: मराठा आणि ओबीसी आंदोलनातील आ. टोपे यांच्या भूमिकेवर टीका झाली. त्यामुळे दोन्ही समाजातील नाराजीचा सामना यंदा टोपे यांना निवडणुकीत करावा लागणार आहे.

राष्ट्रवादी जिल्ह्यात मजबूत का झाली नाही
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, अजित पवार यांनी वेळोवेळी आ. राजेश टोपे यांना पक्ष-संघटन वाढविण्यासाठी बळ दिले. महिला संघटन वाढावे, यासाठी सुप्रिया सुळेही नेहमीच जालन्याच्या दौऱ्यावर असायच्या. परंतु, घनसावंगी, अंबड वगळता इतर तालुक्यात राष्ट्रवादी वाढलीच नाही, अशी टिका पक्षातीलच नेते खासगीत करतात. विशेष म्हणजे पक्षाचे प्रमुखपद आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याकडे सोपविल्याचा सूरही आवळला जात आहे. भोकरदनमध्ये माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यामुळे राष्ट्रवादी बळकट असली तरी इतर ठिकाणी मात्र पक्षाची वाताहत दिसून येते.

उसाचे राजकारण
काही वर्षांपूर्वी टोपे यांच्याच कारखान्याला ऊस द्यावा लागायचा. परंतु, त्यातही आपला आणि विरोधक असे मोठे राजकारण केल्याचा आरोप वेळोवेळी शेतकऱ्यांसह विरोधकांनी केला आहे. त्याला पर्याय म्हणून सतीश घाटगे आणि नंतर हिकमत उढाण यांनीही आपापले युनिट सुरू करून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि टोपे यांच्या कारखान्यापेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न केल्याचा सूरही निघतो. त्यामुळे उसाच्या राजकारणाचेही उत्तर निवडणुकीत मविआच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना द्यावे लागणार असल्याचे सांगितले जाते.

अजित पवारांनी दिल्या होत्या कानपिचक्या
राजेश टोपे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात आले होते. टोपे यांच्या घराकडे जाताना रस्त्यांची दुरवस्था आणि शहरातील अस्वच्छता पवारांच्या नजरेत आली होती. त्यावेळी अजित पवार यांनीही टोपे यांच्या घरीच कानपिचक्या दिल्याची चर्चा होती. या कानपिचक्यांवर राष्ट्रवादीच्या नाराज गटात चांगलीच चर्चा रंगली होती.

गत निवडणुकीतील मतदान: २०१९
राजेश टोपे- राष्ट्रवादी- १,०७,८४९
हिकमत उढाण- शिवसेना- १,०४,४४०
विष्णू शेळके- वंचित- ९२९३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगी