शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
4
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
5
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
6
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
7
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
8
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
9
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
10
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
11
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
12
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
13
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
14
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
15
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
16
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
17
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
18
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
19
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
20
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
Daily Top 2Weekly Top 5

जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:32 IST

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, खुद्द राष्ट्रपतींनी थेट इशारा दिला आहे. जर लवकरच पाऊस झाला नाही, तर देशाच्या राजधानीतील लोकांना दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी विस्थापित करावे लागू शकते.

इराण या देशात सध्या पाण्याची अशी गंभीर टंचाई निर्माण झाली आहे, ज्याची कल्पना करणेही कठीण आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, खुद्द राष्ट्रपतींनी थेट इशारा दिला आहे. जर लवकरच पाऊस झाला नाही, तर देशाच्या राजधानीतील लोकांना दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी विस्थापित करावे लागू शकते. राजधानी तेहरानची लोकसंख्या जवळपास दीड कोटी असल्याने सगळ्यांवर परिणाम होणार आहे.

कोरडे पडलेले जलाशय, पाण्यासाठी तळमळणारी राजधानी आणि आकाशाकडे पाहत असलेले लोक हे दृश्य आहे इराणमधील.. इराण सध्या ज्या जलसंकटातून जात आहे, त्याची तीव्रता ऐकूनच परिस्थिती किती भयानक आहे, याची कल्पना येते. पाण्याची कमतरता इतकी वाढली आहे की, राष्ट्रपतींना सार्वजनिकरित्या येऊन लोकांना इशारा द्यावा लागला आहे की, जर लवकर पाऊस झाला नाही, तर राजधानीतून नागरिकांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.

हे संकट केवळ तेहरानपुरते मर्यादित नाही. देशातील २० हून अधिक प्रांतांमध्ये महिन्यांपासून पाण्याचा थेंबही नाही. शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत, तलाव गायब झाले आहेत आणि अनेक शहरांमध्ये लोक बादल्या घेऊन तासन्तास पाण्याच्या प्रतीक्षेत उभे आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे संकट केवळ एक-दोन वर्षांचे नाही, तर अनेक पिढ्यांवर याचा परिणाम होईल.

राजधानीत सर्वाधिक वाईट अवस्था

सीएनएनच्या एका वृत्तानुसार, सुमारे १.५ कोटी लोकसंख्या असलेली देशाची राजधानी तेहरान सर्वात भीषण संकटाचा सामना करत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य जलाशय फक्त ११% भरलेले आहेत. शहराजवळील एक मोठे धरण केवळ ९% क्षमतेवर आले आहे. दुसरे महत्त्वाचे धरण ८% क्षमतेवर पोहोचले आहे, जो पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत धोकादायक स्तर आहे. अनेक भागांमध्ये नळांना तासन्तास पाणी येत नाही. सरकारने अधिकृतपणे पाणी जपून वापरण्याची घोषणा केलेली नाही, परंतु लोक सतत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी करत आहेत.

६ वर्षांपासूनचा दुष्काळ, आतापर्यंतचे सर्वात वाईट संकट!

इराण गेल्या सहा वर्षांपासून सततच्या दुष्काळाचा सामना करत आहे. तज्ज्ञांच्या मते, हा दुष्काळ केवळ दीर्घकाळ टिकणारा नाही, तर त्याची तीव्रताही अभूतपूर्व आहे. कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. त्यातच हवामान बदलाने जणू आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

जलसंकट इतकं मोठं कसं झालं?

जलतज्ज्ञांच्या मते, ही पाण्याची समस्या अचानक निर्माण झालेली नाही. यामागे अनेक दशकांपासूनची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. नद्यांवर जास्त धरणे बांधणे, भूजलाचा अंदाधुंद वापर, जुन्या आणि गळक्या पाईपलाईन, जास्त पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा विस्तार, पाण्यावर अवलंबून असलेली शेती धोरणे ही महत्त्वाची कारणे आहेत. देशात सुमारे ९०% पाणी शेतीसाठी वापरले जाते. तांदळासारखी जास्त पाणी लागणारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, ज्यामुळे भूजलाची पातळी सातत्याने खालावत आहे.

सरोवरे कोरडी, नद्या गायब!

एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक असलेले प्रमुख सरोवर आता जवळजवळ पूर्णपणे कोरडे पडले आहे. तज्ज्ञ याला 'वॉटर बँकक्रप्सी' म्हणजेच जल-दिवाळखोरी म्हणतात. इराणमध्ये पाण्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोक मोठ्या संख्येने मशिदी आणि धार्मिक स्थळांवर जाऊन पावसासाठी प्रार्थना करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's capital faces evacuation due to severe water crisis.

Web Summary : Iran grapples with a severe water crisis, potentially forcing Tehran's evacuation. Decades of poor water management, drought, and climate change have depleted resources, impacting millions. Critical water reserves are drastically low, prompting dire warnings and prayers for rain.
टॅग्स :Iranइराणwater shortageपाणी कपात