शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांचा खातमा

By admin | Updated: July 3, 2016 04:32 IST

बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले

ढाका : बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले आणि एका दहशतवाद्याला जिवंत ताब्यात घेतले. त्यांनी केलेल्या २० परदेशी नागरिक ठार झाले होते. त्यात १८ वर्षांच्या तरुषी जैन या भारतीय मुलीचा समावेश
आहे. जखमींमध्येही एक भारतीय डॉक्टर आहे. दहशतवाद्यांनी काल गोळीबार करीत सर्व ग्राहकांना ओलीस धरले होते. ओलिसांमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिक आणि विविध देशांच्या दुतावासांतील अधिकारी होते.
या सर्व ओलिसांची पोलीस व
सशस्त्र दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी सुटका केली. त्यासाठी आज सकाळी पोलीस, सशस्त्र जवान आणि कमांडो यांनी एकत्र मिळून मोहीम हाती घेतली. त्यावेळी मोठी धुमश्चक्री झाली. तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या फैरी झडत होत्या. या काळात किमान १00 स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्याचे हजारांहून अधिक आवाज ऐकू आले. या मोहिमेत सहा अतिरेकी ठार झाले, तर एकाला जिवंत ताब्यात घेण्यात यश आले. दोन पोलीस अधिकारीही मरण पावले. अतिरेक्यांच्या गोळीबारात किमान ४0 जण जखमी झाले असून, त्यात एका भारतीय डॉक्टराचा समावेश आहे.
बांगलादेशात गेल्या काही काळापासून इसिस व अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू असून, हा हल्ला त्याचाच भाग होता. या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर तसेच बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दक्षतेचा भाग म्हणून सैन्य आणि सीमा सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश आहेत. इसिसचे अतिरेकी सीमेपाशी येऊन ठेपल्यामुळे सीमा सुरक्षा दलांनी दोन्ही देशांच्या सीमेवर जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. (वृत्तसंस्था)

तरुषी सुट्टीसाठी ढाक्यात
अमेरिकेत शिकत असलेली तरुषी इंटर्नशिपसाठी बांगलादेशात आली होती. जैन कुंटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील असून तिचे वडील संजिव जैन यांचा ढाका येथे कपड्यांचा व्यवसाय आहे.
हल्ल्यामध्ये ओलीस ठेवलेल्यांत तरुषी होती. दहशतवाद्यांनी तिची हत्या केल्याचे सांगताना मला अतीव दु:ख होत आहे, असे टष्ट्वीट परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.

भारताला दु:ख : पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान
शेख हसीना यांना दूरध्वनी करून ढाक्यातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. भारत संकटाच्या या काळात बांगलादेशसोबत ठामपणे उभा असल्याचे यावेळी ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताचे बारीक लक्ष : ओलीस संकटावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेश सुरक्षा दलाने ओलीस नाट्य संपविण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असल्यामुळे भारत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.