शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 21:26 IST

Pakistan on Jammu-Kashmir : शहबाज शरीफ यांनी बुरहान वानीचा मुद्दा उपस्थित करत भारतावर टीका केली.

Pakistan on Jammu-Kashmir : पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 79 व्या अधिवेशनाला संबोधित केले. शरीफ यांनी आपल्या भाषणात गाझा येथील इस्रायली हल्ल्यावर जोरदार टीका केली. यासोबतच, त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरबाबत गरळ ओकली. भारत काश्मिरींचे हक्क हिरावून घेत आहे. सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काढून घेतलेला काश्मीरचा विशेष दर्जा परत करावा, असे शरीफ म्हणाले. 

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे भारतकलम 370 हटवण्यासारखे पाऊल उचलू शकत नाही. भारत काश्मीरची संरचणा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात बाहेरुन लोकांना आणून वसवले जात आहे. हे थांबले पाहिजे, आम्ही याचा निषेध करतो. भारताने कलम 370 लागू करावे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

बुरहान वानीला काश्मिरी विसरले नाहीतयावेळी शरीफ यांनी दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख केला. ते म्हणाले, भारत सरकार काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे सातत्याने उल्लंघन करत आहे. सरकारची दडपशाही असूनही काश्मीरमधील जनता बुरहान वानीला विसरलेली नाही. बुरहानची विचारधारा काश्मीरींच्या मनात कायम आहे. या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.

भारत आक्रमकता दाखवतोय, त्यामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. भारताने कोणतीही आक्रमकता दाखवल्यास पाकिस्तानकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. भारताने पाकिस्तानच्या सकारात्मक प्रस्तावांना प्रतिसाद दिला नाही, जे निराशाजनक आहे, असेही शरीफ यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370