शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

आता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 11:09 AM

भारताने जम्मू-  काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते.

नवी दिल्ली:  भारताने जम्मू-  काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस इतकी वाईट झाली की त्यांना आता चहापानासाठी लागणारे पैसे देखील भरण्यासाठी परवडत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. 

पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाल्याने चहापानावर होणारा खर्च देखील न परवडणारा झाला आहे. त्यामुळेच सरकारने बैठकी दरम्यान दिला जाणारा चहा- बिस्किटावर बंदी घालण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली आहे. आहे. या निर्णयामुळे ज्या अधिकाऱ्यांना मधुमेहसारखा आजार आहे त्यांना तासंतास चालणाऱ्या बैठकीत काहीही न खाता बसणं कठीण असल्याचे देखील पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हणटले आहे. 

भारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांनीही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले असून युद्धाची धमकीही भारताला दिली होती. याचा परिणाम पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेवर झाला असून तेथे महागाई वाढली आहे. तेथे सोन्याचे दर एक प्रति तोळा 87 हजार रुपयांवर पोहचले आहेत. तर, टोमॅटोची किंमत तब्बल 300 रुपये प्रतिकिलो एवढी झाली आहे. 

पाकिस्तानच्या वित्त आयोगानूसार 2018- 19च्या दरम्यान कर्जाचा बोजा वाढविल्याने त्यांच्या कर्जात  2.29 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षात पाकिस्तानचे कर्ज अनुक्रमे 6.82 अब्ज डॅालर,  4.77 अब्ज डॉलर आणि 6.64 अब्ज डॉलर इतकं आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर