शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

POK वर मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान; पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:12 IST

पाकिस्तानकडे काश्मीरचा जो भाग आहे, तो त्याने चोरी केला आहे असं सांगत जयशंकर यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय या आरोपाचाही समाचार घेतला

लंडन - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर वादाचा मुद्दा अनेकदा पाकिस्तानकडून जागतिक व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यूके दौऱ्यावर गेलेत. यावेळी काश्मीरबाबत पाकिस्तानच्या पत्रकाराने जयशंकर यांना प्रश्न विचारला असता त्यावर जयशंकर यांनी दिलेल्या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद झाली. पाकिस्तानने जर पीओकेवरील ताबा काढला तर काश्मीर प्रश्न सुटेल असं एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. लंडनच्या थिंकटँक हाऊसमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

या कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकार निसालने विचारलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध वापरून काश्मीर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात का, त्यावर एस जयशंकर यांनी एका वाक्यात उत्तर दिले. जर पाकिस्तानने काश्मीरातील एका भागावरील ताबा सोडला तर समस्याच राहणार नाही असं भारतीय परराष्ट्र मंत्र्‍यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले, भारताकडून काश्मीरमधील सर्व गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काश्मीरचा विशेष राज्य दर्जा संपवून कलम ३७० हटवणं हे पहिले पाऊल होते. काश्मीरला आर्थिक सक्षम करत सामाजिक न्याय बहाल करणे दुसरं पाऊल होते. जास्त मतदानासह निवडणूक घेणे तिसरं पाऊल होते. आता काश्मीरचा तो भाग ज्यावर पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आहे ते परत घेणे बाकी आहे. जेव्हा ते होईल तेव्हा समस्या सुटेल असं त्यांनी स्पष्ट सुनावले.

तसेच पाकिस्तानकडे काश्मीरचा जो भाग आहे, तो त्याने चोरी केला आहे असं सांगत जयशंकर यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय या आरोपाचाही समाचार घेतला. आम्हाला राजकीय कारणामुळे या मुद्द्यावर टीकेचा सामना करावा लागतो. काही परिस्थितीत सुधारणा गरजेची असते कारण भारतात मानवाधिकार रेकॉर्ड पाहिला तर तो जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. भारतात मानवाधिकार उल्लंघनाबाबत जी चिंता व्यक्त केली जाते ती चुकीची आहे असंही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले.

दरम्यान, चीनसोबतच्या संबंधावर बोलताना दोन्ही देशाचा इतिहास जुना आहे. ज्यात वेळोवेळी बऱ्याचदा चढ-उतार आलेत. आज दोन्ही देश चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की, हे संबंध स्थिर आणि समतोल कसे बनवले जातील. आम्हाला स्थिर संबंध हवेत, ज्यातून आमच्या हिताचा सन्मान केला जाईल असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

पाकिस्तानला भारताचे खडे बोल

काश्मीर प्रश्नावरून एस जयशंकर यांनी कठोर भूमिका घेतली. मागील वर्षीही एस जयशंकर यांनी म्हटलं होतं, पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर हा भारताचा भाग आहे. पीओके पुन्हा भारताला मिळावा यासाठी भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष कटिबद्ध आहे. ही आमची राष्ट्रीय वचनबद्धता आहे असंही एस जयशंकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर