शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

ओलीस नाट्याचा शेवट..!

By admin | Updated: July 3, 2016 01:44 IST

बांगलादेशच्या कमांडोंनी इसिसच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासह एकाला जिवंत पकडून राजधानी ढाका येथील ओलीस नाट्याचा शनिवारी अंत केला. मात्र, तत्पूर्वी दहशतवाद्यांनी

ढाका : बांगलादेशच्या कमांडोंनी इसिसच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासह एकाला जिवंत पकडून राजधानी ढाका येथील ओलीस नाट्याचा शनिवारी अंत केला. मात्र, तत्पूर्वी दहशतवाद्यांनी २० परदेशी नागरिकांची अमानुष हत्या केली होती. सशस्त्र दलाच्या नेतृत्वाखालील संयुक्त मोहीम सुरू होण्यापूर्वी दहशतवाद्यांनी २० ओलिसांची हत्या केली होती, असे लष्करी मोहिमांचे संचालक ब्रिगेडियर नयीम अश्पाक चौधरी यांनी सांगितले.
यातील बहुतांश जणांना गळे चिरून ठार करण्यात आले, असेही ते म्हणाले. आर्मी पॅरा कमांडो युनिट-१ने या मोहिमेचे नेतृत्व करीत १३ मिनिटांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला, असे चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले. पंतप्रधान शेख हसीना यांनी ओलीस नाट्यात हस्तक्षेपाचे आदेश लष्कराला दिल्यानंतर लष्कराची मोहीम सुरू झाली. या मोहिमेला ‘आॅपरेशन थंडरबोल्ट’ असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. ठार करण्यात आलेले २० ओलीस परदेशी असून, त्यातील बहुतांश जपानी आणि इटालियन आहेत. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर होली आर्टीसन बेकरी उपाहारगृहात शोधमोहीम राबवून मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. (वृत्तसंस्था)

शेवटचा हल्ला सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी
दहशतवाद्यांनी ढाका येथील होली आर्टीसन बेकरी उपाहारगृहाला लक्ष्य केले होते. परदेशी दूतावास व वकिलातींची कार्यालये असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेच्या परिसरात हे उपाहारगृह असून तेथे परदेशी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.

इसिसच्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री या उपाहारगृहावर हल्ला करून अनेकांना ओलीस ठेवले होते. ओलीस नाट्य संपुष्टात आणण्यासाठी लष्कराने शनिवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी शेवटचा हल्ला चढविला.
त्यानंतर काही मिनिटांनी पंतप्रधान शेख हसीना यांनी ओलीस नाट्य संपुष्टात आल्याची घोषणा केली. सुरक्षा दलांनी मोहीम फत्ते केली. सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासह एकाला जिवंत पकडल्यानंतर १३ ओलिसांची सुटका केली, असे त्या म्हणाल्या.

अल्लाहचे आभार : लष्करप्रमुख जनरल अबू बेलाल मोहंमद शफीउल हक या वेळी त्यांच्या बाजूला होते. आम्हाला दहशतवाद्यांचा खात्मा करून ओलिसांची सुटका करता येऊ शकली याबद्दल मी अल्लाहचे आभार मानते. एकाही दहशतवाद्याला पळून जाता आले नाही. त्यांच्यापैकी सहा जणांचा खात्मा करण्यात आला तर एकाला जिवंत पकडण्यात आले. बांगलादेशातून हिंसक कट्टरवाद आणि दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली.

ओलिसांत भारतीय, श्रीलंकन, जपानी नागरिक
सुटका करण्यात आलेल्या ओलिसांत भारतीय, श्रीलंकन आणि जपानी नागरिकांचा समावेश आहे. हल्ल्यात ३० लोक जखमी झाले असल्याचे हसीना यांनी सांगितले. इस्लामिक स्टेटने आपल्या अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, घटनास्थळाची अनेक छायाचित्रेही पोस्ट केली आहेत.

हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. या लोकांना मुस्लीम कसे म्हणायचे? त्यांना कोणताही धर्म नाही. रमजानच्या तराबी प्रार्थनेचे आवाहन दुर्लक्षून ते लोकांना ठार मारण्यासाठी गेले. त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना ठार केले ते सहनशक्तीच्या पलीकडचे आहे. त्यांचा कोणताही धर्म नाही. दहशतवाद हाच त्यांचा धर्म आहे.
- शेख हसीना,
पंतप्रधान, बांगलादेश