शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 11:49 IST

बांगलादेशची राजधानी ढाका येथील हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडले आहे.

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २ - बांगलादेशची राजधानी ढाका येथील हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडले आहे. ढाका येथील परदेशी दूतावास, वकिलांतीची कार्यालये असलेला, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले. मात्र लष्कराच्या जवानांनी दहशतवादयांना प्रत्युत्तर देत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व एकाला जिवंत पकडले.  जवानांनी काही परदेशी नागरिकांसह १३ ओलीसांची रेस्टॉरंटमधून सुखरूप सुटका केली. रेस्टॉरंटमधील गोळीबार आता थांबला असून १ दहशतवादी फरार झाल्याची माहिती मिळत आहे. 
 
आणखी वाचा :
(बांगलादेशात इसिसचा दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू)
  •  
 शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबादारी इसिसने (इस्लामिक स्टेट) स्वीकारली असून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार व बॉम्बहल्ले करत अनेक निरपराधांचे जीव घेतले. या हल्ल्यात काही परदेशी नागरिकांसह पोलिसांचाही मृत्यू झाला आहे. गेल्या १२ तासांहून अधिका काळापासून सुरू असलेली ही चकमक आता थंडावली असून अनेक ओलीसांना रेस्टॉरंटमधून सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आल्याचे समजते.हल्ल्यातील जखमींना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
अनेक परदेशी पर्यटकांचा राबता असणारा ढाक्यातील 'गुलशन' परिसर महत्वपूर्ण मानला जातो. शुक्रवारी ( १ जुलै) रात्री ९ च्या सुमारास ८ ते १० दहशतवाद्यांनी आर्टिझन बेकरीत घुसून बेछूट गोळीबार करण्यास सुरूवात केली आणि एकच हल्लाकल्लोळ माजला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस व लष्कराने घटनास्थळी धाव घेत आसपासच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र रेस्टॉरंटमधील सुमारे ६० नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवत पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यातील काही जणांना ठारही केले.  त्यानंतर पोलिसांनी या रेस्टॉरंटला पूर्णपणे घेरत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान ढाका येथील भारतातील सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्प्ष्ट करण्यात आले आहे. 
  
 
हल्लेखोर अल्लाहू-अकबरच्या घोषणा देत रेस्टॉरंटमध्ये घुसले व  हा हल्ला केला असे ट्विट प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले.