शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

आशिया कप: ४-१ ने दक्षिण कोरियाला नमवून भारत बनला चौथ्यांदा चॅम्पिअन; वर्ल्डकपसाठी झाला क्वालिफाय...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 22:00 IST

बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हॉकी स्पर्धा खेळविण्यात आली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच मिनिटाला गोल करून कोरियावर दबाव आणला.

भारतात सुरु असलेल्या आशियाई हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने विजय प्राप्त करत वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केले आहे. दक्षिण कोरियासोबतच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ४-१ ने विजय प्राप्त केला आहे. अशाप्रकारे भारतीय संघ चौथ्यांदा चॅम्पिअन बनला आहे. 

बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हॉकी स्पर्धा खेळविण्यात आली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्याच मिनिटाला गोल करून कोरियावर दबाव आणला. २९ व्या सेकंदाला हा गोल झाला, यानंतर कोरियाचा संघ सावध झाला आणि डिफेन्स मोडवर गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला पुढचे गोल करण्याची संधी मिळाली नाही.  

परंतू दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाकडून दिलप्रित सिंगने २८ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. पहिल्या हाफमध्ये भारताने कोरियावर २-० अशी आघाडी मिळविली होती. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु होताच दिलप्रितने तिसरा गोल डागला आणि ३-० अशी आघाडी घेतली. तर चौथा गोल अमित रोहिदास याने नोंदविला. याच क्वार्टरमध्ये कोरियाने देखील एक गोल करण्यात यश मिळविले, त्यांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला परंतू भारताने तो हाणून पाडला. 

२००३, २००७, २०१७ नंतर भारताने २०२५ मध्ये चौथ्यांदा आशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. १९८२, १९८५, १९८९, १९९४ आणि २०१३ मध्ये पाच वेळा संघ उपविजेता राहिला आहे.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSouth Koreaदक्षिण कोरिया