शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नववसाहतीत पाणी आले, रस्ते होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST

हिंगोली शहराच्या आजूबाजूला असलेली शेती आता अकृषिक होत असून मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती उभारल्या जात आहेत. काही भाग ग्रामीण ...

हिंगोली शहराच्या आजूबाजूला असलेली शेती आता अकृषिक होत असून मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती उभारल्या जात आहेत. काही भाग ग्रामीण क्षेत्रात येत असल्या तरीही शहरी भागात मोडणाऱ्या वसाहतींचीही बोंब कायम आहे. रस्ते, पाणी, विजेचे खांब आदींसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वसाहतींमध्ये नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था केली. ही एक बाब सोडली तर अनेक वसाहतींना रस्त्यांचा प्रश्न मात्र सतावत आहे. अशा वसाहतींपैकी काही ठिकाणचे रस्ते ठोक अनुदानात मंजूर झाले. मात्र, काही भागांतील रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नवीन लेआऊट पडल्यानंतर त्यातील सुविधांचा कोणीच आढावा घेत नाही. मात्र, अशा ठिकाणी भूखंड खरेदी करून निवासी व्यवस्थेला जाणारे नागरिक नंतर या सुविधेसाठी पालिकेच्या नावाने बोटे मोडतात. पालिकाही अशा भागातील करवसुली सुरू करते. मात्र, सर्व सुविधा एकाचवेळी देणे शक्य नसल्याचे सांगून वेळकाढू धोरण अवलंबते. शहरातील जवळपास २० ते २५ नव्या वसाहती यात पिचल्या जात आहेत.

रस्ते, वीज, पाण्याच्या समस्या कायमच

हिंगोली : शहरातील कमलानगर, शाहूनगर, ज्योतीनगर, इंदिरानगर, रामकृष्णा टाऊन, आंबेडकरनगर, तिरुपतीनगर, साईनगर आदी नगरांत अनेक वर्षांपासून रस्ते, नाल्या, पाणी या समस्या कायमच आहेत. अनेकवेळा विनंती, अर्ज करुनही त्या सोडविल्या जात नाहीत. या नगरांमध्ये नाल्या नसल्यामुळे पाणी रस्त्यांवर येत आहे. काही ठिकाणी रस्ते व नाल्या अर्धवट स्थितीत करुन ठेवल्या आहेत. रस्ते, वीज, पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रफुल्ल सूर्यवंशी, आशिष लोकडे, सय्यद तय्यब, ज्योतीपाल रणवीर, आशिष इंगळे यांनी केली आहे.

हिंगोली : शहरातील आंबेडकर नगरामध्ये दहा वर्षांपासून साेईसुविधा नागरिकांना मिळत नाहीत. पाणी, रस्ते, वीज ही समस्या जटिल होऊन बसली आहे. या नगरातील रस्ते जागोजागी उखडले आहेत. नाल्या बांधलेल्या नाहीत. पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत नाही. तसेच अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत.

- राहुल खिल्लारे

हिंगोली : शहरातील रामकृष्णा टाऊन या नगरात रस्ते, पाणी, वीज ही समस्या चांगलीच भेडसावत आहे. या नगरामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे लोकसंख्या आहे. परंतु, त्यामानाने कोणतीच सुविधा येथे दिसत नाही. पाईपलाईन टाकणे गरजेेचे असताना विनंती, अर्ज करुनही ती टाकलेली नाही. नाल्यांचीही समस्या कायमच आहे.

- सुनिता दराडे

हिंगोली : शहरातील कमलानगर, शाहूनगर, ज्योतीनगर, इंदिरानगर, रामकृष्णटाऊन, आंबेडकरनगर, तिरुपतीनगर, साईनगर हा भाग गुंठेवारी क्षेत्रात येतो. शासनाच्या निधी प्राप्तीनुसार याठिकाणी सोयी-सुविधा केल्या जातात. यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी हे विविध विकासकामासंदर्भात ठराव घेतात. सध्यातरी यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.

-डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न. प. हिगोली