शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

पुन्हा ७३ शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:30 AM

हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने ...

हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने मागील महिनाभरात गावात रुग्ण आढळला की नाही, याची चाचपणी करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. अनेक गावांत मागील दोन महिन्यांपासून एकही रुग्ण नाही. मात्र तरीही शाळा सुरू करण्यासाठी नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ग्रामपातळीवर दैनंदिन सर्व व्यवहार सुरू आहेत. मुले एकत्रित खेळण्यासह गावात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होताना दिसत आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्यापासून मास्कसह इतर सर्वच बाबींचा विसर पडल्याचे दिसत आहे. अशावेळी शाळा सुरू झाल्या तर या मुलांमध्ये जागृती करून त्यांच्यामार्फत पालकांनाही दक्षतेचे धडे देता येणार आहेत. मात्र समित्यांसह प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याबाबत उदासीनता दिसत आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमलीची घटली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनानेही स्पष्ट निकष ठरवून दिले आहेत. त्यानंतरही मुलाला शाळेत पाठवायचे की नाही, याची संमती पालकांनीच द्यायची आहे. मात्र शाळा सुरू करण्यासाठी एवढा विलंब होत असल्याने प्रशासकीय पातळीवरूनच शाळा सुरू न करण्याचा घाट घातला जात असल्याचे चित्र आहे.

माध्यमिक विभागाकडून आता ४० शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव सज्ज आहेत. यापूर्वी ८ शाळा सुरू झाल्या आहेत. तर प्राथमिककडून ३३ शाळांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.